बालकांचे संगोपन करणे आवश्यक
बालकांना*मोबाईल पासुन दूर ठेवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे
शहर प्रतिनिधी: आर्वी..
सध्या समाज माध्यमातून आरोग्य संदर्भात प्रचंड प्रमाणात विविध सूचना व सल्ले येत असले तरीही हे कीती प्रमाणात वैद्यकीय. दुष्टया अधिकुत आहेत, हा संशोधनाचा व.चर्चेचा विषय आहेत.
आपल्या देशात भौगोलिक परिस्थिती ही समसमान नसल्याने हवामान, वातावरण, ऋतुचर्या,दिनचर्या, आहार व विहार हे विभिन्न आहेत, त्यामुळे ऋतुनुसार,शरीरप्रकुतीनुसार याचे आपणाकडून व्यवस्थित पालन झाले नाहीत, तर अनेक नानाविध आजारांना निमंत्रण मिळते. विशेषतः शिशु व बालकावर या वातावरणाचा लवकर परिणाम दिसून येतो. अर्थात घरातील एखादे बाळ तिन वर्षेपर्यंत आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या संगोपनात असते. नंतर बालक मंदिर किंवा काँन्व्हेटमध्ये प्रवेश घेतला कि त्याच्या संगोपनात आमूलाग्र बदल होतो, या वेळा जर यदाकदाचित दुपारच्या असल्यास थोडी सुसह्यता असते, परंतु सकाळच्या वेळा या त्या बालकाला आणि कुटुंबाला एक प्रकारे तारेवरची कसरतच असते. त्याचे दैनंदिन जीवन हे सुखकर होण्यापेक्षा अधिकच त्रासाचे होते. झोपेची, खानपान व खेळण्याच्या वेळामध्ये सुसूत्रता नसल्याने बाळाची शारीरिक वाढ तर होते, पण त्याचा मानसिक परिणाम विपरीत होवू शकतो.
वास्तविक पाहता बालकाची ५ते६ वर्षे ही आरोग्य दुष्टया अत्यंत मोलाची असतात. या वेळात बालकाला कुटुंब अत्यंत महत्त्वाचे असते. त्याच्या शारीरिक, मानसिक व भावनिक दुष्टया हे वय त्याचे भविष्यातील व्यक्तीमत्व घडविणारे असते..
तूर्तास मात्र ही परिस्थिती सध्या च्या काळात दुरापास्त होत चालली आहेत. घरात ,सध्या दूरदर्शन, मोबाईल, लँपटाँप,काँप्युटर, टँब व इतर तांत्रिक उपकरणांनी इतके आत्कुष्ट केले की, इतर आवश्यक नैतिक संस्कार मिळणे, हे आता कुटुंबात दुरापास्त झाले आहेत. त्याच्या करिता वेळ काढुन त्यांना घडविणारे नसल्याने ही येणारी पिढी आरोग्य दुष्टया सुदृढ व मानसिक दुष्टया संस्कारीत होईल की नाहीत, ही साधार भिती निर्माण झाली आहे.
शाळा किंवा काँन्व्हेटमधून ही उणीव भरून निघत असेल तर ही स्वागतार्हच बाब आहेत, पण त्यांचा अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव आहेत की नाही, हा पण चर्चेचा व संशोधनाचा विषय आहे.
साप्रंत काळात आज अनेक बालके,विविध आजारांनी त्रस्त आहेत, किंबहुना शारीरिक प्रतिकारशक्ती दिवसोदिवस कमी होत असल्याने वातावरण बदलले की आजारी पडणाऱ्या बालकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत आहेत. याचे प्रमुख कारण हेच की जन्मापासून त्यांना विविध प्रतिकारशक्ती वाढविणारे नैसर्गिकत:सकस आहार, अन्न इतर पदार्थ व शारीरिक हालचाली च्या अभावामुळे कधीकधी ते.वातावरणातील बदलाला स्वीकार करु शकत नाहीत. आधुनिक काळातील औषधे ही तात्पुरती ठीक असतात. परंतु त्या औषधाने प्रतिकारशक्ती वाढत नाहीत, हे प्रत्येकाला मान्य करावे लागेल.।यासाठी कुटुंबानी जाणीवपूर्वक .योग्य वेळ खर्च करणे क्रमप्राप्तच झाले आहेत.
*प्रतिक्रिया*
आधुनिक काळात आपल्या जीवनशैलीत बदल झाल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहेत. तरीही पण आपल्या बालकांना निरोगी ठेवण्यासाठी पालकांनी डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्याने नैसर्गिक घटक युक्त पदार्थ देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत, लहान बालकांना वेळोवेळी सकस व जीवनसत्त्व युक्त आहार दिला पाहिजे. तसेच बालकांना लहान वयात मोबाईल अजिबात त्याच्या हातात देवु नयेत. मोबाईलचे गंभीर परिणाम आरोग्यावर होते. मोबाईल चा अति वापर मुलांना शारिरीक ,मानसिक, भावनिक दुष्टया पंगू बनवू शकतो. त्यामुळे तांत्रिक उपकरणापासुन आपल्या मुलांना पालकांनी दूर ठेवावे. तसेच बालकांना औषधोपचार देतांना तज्ञ डॉक्टरांचा समर्पक व तार्किक सल्ला घ्यावा.
*डॉक्टर* *कलिंदी रिपल *राणे*
स्रीरोग तज्ञ आर्वी
………. प्रतिक्रिया
.सध्याच्या धावपळीच्या. काळात लहान बालकांना सकस आहार मिळणे, दुरापास्त असुन, रासायनिक तेच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस खालावलेला आहेत. त्यामुळे शेतात सुध्दा फवारणिचा अतिवापर आपल्या अन्न धान्यावर होतं असल्याने नैसर्गिक घटक युक्त आहार मिळेणासे झाला आहेत. त्यामुळे पालकांनी जैविक, नैसर्गिक अन्न पदार्थ व भाजीपाल्याचा वापर करून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, गरजेचे आहेत. रासायनिक पदार्थांचा वापर कमी प्रमाणात करावा. शक्य झाल्यास रासायनिक पदार्थ आहारात टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करावा.
*अविनाश* *टाके*
आर्वी. जिल्हा. वर्धा.