पुसद – मुंबई रातराणी एसटी बस पुलावरून खोल खड्ड्यात कोसळली
भीषण अपघात ४२ प्रवाशी जखमी
जखमींना जालना रूग्णालयात दाखल
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद – जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केंधली येथील पुलाजवळ दि.८ ऑगस्ट, मंगळवार रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पुसद मुंबई रातराणी बस जालन्याकडे जात असताना अचानक ट्रक समोरून दिसल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटल्याने बस थेट पुलाजवळील १५ ते २० फूट खड्डयात कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. आयशर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आहे.बस थेट पुलावरून खाली कोसळल्याने थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जालन्याच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची यवतमाळ आगाराची बस ४२ प्रवाशांना घेऊन पुसद येथून मुंबईच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, बस जालना ते मंठा या महामार्गावर आली असता, केंधळी पुलाजवळ आयशरला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत बस थेट पूलावरून १५ ते २० फूट खाली कोसळली.अपघातावेळी या बसमध्ये वाहक आणि चालक यांच्यासह ४२ प्रवासी होते. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढून उपचारसाठी मंठ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील आठ प्रवाशांना अस्वस्थ आणि मुकामार लागल्याने त्यांना उपचारसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप घोडके हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी ८ जखमी प्रवाशांची विचारपूस करून प्रकृती जाणून घेतली.बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक अडचणीत येत आहे ते तेवढ्याच सत्य.