प्लास्टीकचा भस्मासूर आता शहरापासून गावापर्यंत पोहचला
*नवचैतन्य संस्थेणी घेतला स्वच्छतेचा वसा हाथी*
घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
रिकामा कशास फिरतो रे बाबा तुझं गावचं नाही का तीर्थ! या तुकडोजी महाराजांच्या भजनातील ग्रामओळी प्रमाणे गावाला स्वच्छतेची शिकवण देत शिरोली येथील नवचैतन्य संस्था सातत्याने वेगवेगळे काम हाती घेऊन पर्यावरण संवर्धनाचे काम करीत असते. सध्या प्लास्टिकचा वाढत्या वापरा मुळे प्लास्टीकचा भस्मासुर शहारा पासून तं गाव पर्यंत पोहचला आहे. यामुळे नैसर्गिक वातावरण खराब होण्यास सुरुवात झाली. अश्यातच नवचैतन्य संस्थेने गावातील नाल्यामधील साचलेला चा कचरा पाहला आणि हा नाल्यातील कचरा साफ करण्यासाठी विचाराधीन असताना शिरोली या गावातील सिद्धांत सिसले या तरुणाने या कामाकरीता श्रमदान करण्याची इच्छा दर्शवून गावातील दसरीच्या नाल्यातील कचरा साफ करण्या करिता पुढाकार घेतला.स्वत: त्याने नाल्यातील निर्माल्य, प्लास्टिक पतरवळी, फायबरचे द्रोण, प्लास्टिक पोते, खराब झालेल्या औषधी, वेगवेगळी वाहत्या पाण्यास अडथळा ठरणारी कपडे, समारंभात उरलेले पोत्यात भरून टाकलेले अन्न, अश्या अनेक गोष्टी या युवकाच्या सहकार्याने पाण्यातून बाजूला काढून खराब झालेला पाण्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला.पाहता पास्ता अख्खा नाला साफ झाला युवक जर स्व इच्छेने समोर आले तर श्रमदानातून काय होऊं शकतो हे या युवकाने दाखवून दीले. सदर कार्यामूळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ झाले ऐवढेच नाही तर यामुळे जलचर प्राणी मोकळा श्वास घेतील अशी आश्या व्यक्त करून नागरिकांनी या पुढे नैसर्गिक स्त्रोतात कचरा टाकू नये असे आव्हान नवचैतन्य संस्थे तर्फे गावकरी नागरिकात पटवून देण्यात आले या कार्यासाठी राहुल जीवाने व प्रफुल रा. राऊत यांनी व्यक्त केली सहकार्य करत यूवकात चेतना जागवली.
00000000000000