अंजनगाव तालुक्यात सततच्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान.
शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
गेली पंधरा दिवसापासून अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये दररोज वादळी वाऱ्यासह येत असलेल्या
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून तालुक्यातील खोडगाव, चौसाळा, सातेगाव ,देवगाव, पांढरी, शेलगाव, धाडी, शिरजगाव ,लखाड ,चिंचोली ,मुरा विहीगाव ,हतोडा, हिरापूर, निमखेड,सह संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांच्या गहू, कांद्या, केळी, पान पिपरी,,उन्हाळी ज्वारी तसेच इतर फळबागांचे , भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी गहु सोंगुन ठेवला आहे तर काहींचा गहू हा उभा असताना वादळी पावसाने तो खाली पडला आहे तर कांद्याच्या जवणी लावल्या त्या सुद्धा पावसामुळे पूर्णतः खराब झाल्या आहेत, ज्वारीचे पीक सुद्धा खराब झाले आहे तसेच संत्रा केळी व इतर फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एप्रिल महिना उलटून गेला असून मे महिन्यात सुद्धा पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केव्हा करावी? असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.