शाशकीय

जलजीवन मिशन च्या कामात चोरीच्या विजेचा वापर

Spread the love

सावरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कंत्राटदाराचा प्रताप
 महावितरण व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून चिरीमिरीतून आर्थिक व्यवहार
भंडारा (जवाहरनगर) प्रतिनिधी – शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे, मात्र कुठे तांत्रिक तर कुठे अन्य बाबीमुळे शुद्ध पाणीपुरवठ्याची योजना बारगळली जाते. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरातील सावरी ग्रामपंचायत अंतर्गत मागील तीन महिन्यापासून भंडारा जिल्हा परिषद जलजीवन मिशन.अंतर्गत सावरी येथे हर घर जल घोषित करण्यात आली आहेत मात्र ही मोहीम
ग्रामस्थांची खरंच तहान भागविणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यांचे कारण ही पुढे आले आहे,मागील तीन महिन्यापासून गावातील गल्ली बोळातील प्रत्येक नव्या कोऱ्या सिमेंच्या रस्त्यावर मुख्य पाईप लाईन करिता नाली खोदकाम हाती घेण्यात आले आहे,या कामात चक्क गावातील पोल वरून चोरीची विद्युत लाईंनचा वापर सुरू आहे.
याविषयी गावातील काही सुजाण नागरिकांनी हरकती घेतली असता ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून संबधित ग्रामस्थांना दमदाटी करून धमकी दिले जात आहे हा सर्व प्रकार मागील तीन महिन्यापासून सतत सुरू असून याकडे जाणून बुजून संबधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे

जल जिवन मिशन च्या कामामुळे सध्या सावरी जवाहरनगर ग्रामपंचायात हद्दीतील नव्या कोऱ्या सिमेंट रस्त्याची वाट लावण्यात आली आहे पुन्हा या नव्या कोऱ्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी नव्याने लाखो रुपये ग्रामपंचायत खर्च करेल,यात शंका नाही.
पाणी व स्वच्छता मिशन ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय भंडारा चे वतीने भंडारा तालुक्यातील निवडक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याकरिता गाव पातळीवर मोहीम सुरू आहे; मात्र या मोहिमेला तांत्रिक
बाबीचा फटका पोहोचत आहे. गत दीड वर्षापासून ही मोहीम राबवित असताना काही गावातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटलेली नाही. हर घर जल घोषित करण्याकरिता गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले; परंतु याचा कितपत फायदा ग्रामस्थांना झाला, हा प्रश्नच असला तरी,सावरी येथील नव्याने हाती घेतलेल्या कामात चोरी केलेली विद्युत पुरवठा वापरून कंत्राटदार बांधकामे करीत असेल व त्याचा भुर्दंड ग्रामपंचायत नागरिकांकडून कराचे माध्यमातून वसूल करीत असेल तर ही सर्वसामान्य नागरिकांची केलेली आर्थिक पिळवणूक नाही का? कामे कंत्राटदारचे व आर्थिक नुकसान जनतेचे मागील तीन महिन्यापासून सुरू आहेत,या कामात गावातील पोल वरील मुख्य लाईन वरून विद्युत चोरी करून याचा वापर केला जात असल्याने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व ग्रामपंचायत चे अधिकारी सांगतात की कंत्रादारांकडून विद्युत चोरी केली जात नाही,ग्रामपंचायत चे विद्युत पुरवठा होत असलेल्या लाईन वरून वापर सुरू आहे त्याचा भुर्दंड ग्रामपंचायत सहन करीत आहे, मग सर्वसामान्य नागरिक पोल वरून विद्युत लाईन चोरी करीत असेल तर ग्रामपंचायत ऐवजी विद्युत विभाग का कार्यवाही करीत असतो,ग्रामपंचायत चे विद्युत वापर होत असेल तर त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या करातूनच वसुल केला जाईल का? की अधिकारी आपल्या पगारातून याचा भुर्दंड सहन करेल हा प्रश्न विचाराधीन असला तरी
या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वर कारवाई कोण करणार हाही प्रश्न येथील नागरिकापुढे उपस्थिती झाला आहे

जल जिवन मिशन अंतर्गत सावरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असलेल्या कामातील खोदकामात वापरात येत असलेली विद्युत पुरवठा डायरेक्ट पोल द्वारे घेतली जात आहे त्या मोबदल्यात कंत्राटदार ग्रामपंचायत ला मोबदला देण्याचे ठरले आहे.
एच.एम. पडोळे
ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचयत, सावरी जवाहरनगर

 

 जल जिवन मिशन अंतर्गत खोदकामात वापरलेली विद्युत पुरवठा डायरेक्ट पोल द्वारे घेऊन चोरी केली असेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यास हरकत नाही
महेश कोाडवते,शाखा अभियंता,एम.एस ई. बी.शहापूर सर्कल,

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close