एसटी बस अभावी एन हिवाळ्यात खानापूर, बोपापुर मधील असंख्य विद्यार्थी जीव मुठीत घेऊन सायकलने अचलपूर शहरात शिक्षणासाठी करतात प्रवास…
अचलपूर (प्रतिनिधि)किशोर बद्रटिये – अचलपूर शहराला लागूनच असलेल्या खानापुर , बोपापुर गावातून असंख्य विद्यार्थी आज अचलपूर तसेच परतवाडा शहरात प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेत आहे .मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या गावातील विद्यार्थ्याना संबंधित शाळेत ये- जा साठी एस टी बस अभावी सायकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .या मार्गावर एस टी बस ची फेरी सुरू करण्याबाबत परतवाडा बस आगारप्रमुख यांच्या कडे ग्रामपंचायत बोपापुर,विविध शाळा ,विद्यार्थ्यांनी अनेक वेळी मागणी केली आहे .परंतु या बाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही .यामुळे थंडीचा प्रमाण वाढत असताना विद्यार्थ्याना दररोज कुटुंबातील सदस्यासोबत दुचाकी वाहनांने आणि सायकल प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच मोठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या मार्गावर गांधीपुल ते खानापूर, बोपापुर ये – जा फेरी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बस फेरी ची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याना अनेक वेळी शाळेत जाताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.आणि वातावरणाचा लहरीपणा व गावापासून अचलपूर शहरातील शाळेचे अंतर व वाढते अभ्यासाचा ओझा याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांचा शिक्षणावर होतो .यामुळे या गावात एसटी बस ची फेरी लवकर सुरू झाल्यास विद्यार्थ्याना शाळेत ये – जा साठी करावा लागणाऱ्या संघर्षातून मुक्तता होऊ शकणार आहे .