सामाजिक

चिंचपूर मध्ये पाणी पेटले

Spread the love

सरपंच आणि सचिवाच्या  दुर्लक्षामुळे उद्भवली परिस्थिती

गावातील अनेक हँडपम्प बंद स्थितीत

नदीकाठी असलेल्या गावाला सोसावी लागत आहे कृत्रिम पाणी टंचाई ची झळ
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
                     सरपंच आणि सचिवाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील चिंचपूर येथे पाणी पेटले आहे. गावातील अनेक हँडपम्प बंद असल्याने पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. योग्य नियोजन नसल्याने नदीकाठी असताना सुध्दा गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
              तहासिलमधील चिंचपूर येथे तीव्र पाणी टंचाई स्थिती उद्भवली आहे. नदीवरून येणाऱ्या पाईप लाईन ची मोटार जळाल्याने आणि तिची दुरुस्ती न झाल्याने पाणी टंचाई उद्भवल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
हँडपम्प बंद असल्याने झळा आणखी तीव्र – गावकरयांच्या म्हणण्या नुसार गावातील अनेक हँडपम्प नादुरुस्त स्थितीत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा जास्त जाणवत आहे.
योग्य नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती – गावातील अनेक हँडपम्प पूर्वीपासून नादुरुस्त स्थितीत आहेत. आम्ही अनेकवेळा ही बाब सरपंच आणि सचिव यांच्या कानावर टाकली. पण त्यांनी या प्रश्नाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. वेळेवर नियोजन केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
3

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close