बारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवशींय लाक्षणिक संप, तहसीलदार ह्यांना निवेदन सादर
आगामी निवडणुकात बारी समाज घेणार निर्णायक भूमिका
बारी समाजात नाराजीचा सुर
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गेली आठ महिन्यापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी अखिल भारतीय बारी समाज महासंघा तर्फे संत नगरी शेगाव येथे अखिल भारतीय राष्ट्रीय बारी समाज महाअधिवेशन भरविण्यात आले होते या अधिवेशनास राज्यातील केंद्रीय मंत्री, माजी मंत्री, विरोधी पक्षनेते व सर्वच पक्षाचे नेते व मान्यवर उपस्थित होते व स्वतः उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप द्वारे समाजाला संबोधन करून 1 लाखाच्या घरात समाजबांधव एकत्र झाले होते यामध्ये शासन दरबारी अधिवेशनामध्ये बारी समाजाच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते ह्यामध्ये १)
ह भ प संत शिरोमणी श्री रूपलाल महाराज यांचे अंजनगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक.
२) बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ. ३) पान पिंपरी, पानमळे, मुसळी यांना औषधी पिकाचा दर्जा. परंतु आज पावेतो सदर मागण्यातील एकही मागणीची पूर्तता न झाल्यामुळे अखिल भारतीय बारी समाज विकास महासंघ चे व बारी समाजात नाराजीचा सूर निघत आहे त्यामुळे आगामी निवडणूकीचे काळात महाराष्ट्रातील समस्त बारी समाज हा आपली भूमिका काय? हे निश्चित करणार हे पक्के झाले आहे त्या .करिता बारी समाज बांधव व महासंघ पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्का स्तरावर दि २४ ला तहसील कार्यल्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याबाबत तहसीलदार अंजनगाव ह्यांना निवेदन सादर केले. ह्यामध्ये मनोहर मुरकुटे, दिनेश भोंडे, उमेश भोंडे,अरुण माकोडे, आनंदजी संगई, संजय नाठे , राजेश अस्वार,लखन टिपरे, धीरज धुळे, गोपाल माकोडे, प्रवीण दाभाडे,निलेश ढगे, वृषभ सातपुते , राजेंद्र पाटील , मंगेश पाटील, सुनील माकोडे, गजानन काळमेघ, मुरलीधर तुरखडे, राजेंद्र ढोरे, प्रशांत कोल्हे,आदी समाज बांधव उपस्थित होते.