शेती विषयक
बँक ऑफ महाराष्ट्र ची पिक कर्जासाठी टाळाटाळ ; शेतकऱ्यांची कामे रखडली

रा.का. तालुका अध्यक्ष यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
ऑगस्ट महिना संपत आला तरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिंचोली ने अध्याप शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नसल्याची धक्कादायक आणि संतापजनक बाब समोर आली आहे. बँकेच्या या मनमानी कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेअ चे तालुका अध्यक्ष तथा सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी जिखाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे.
ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांना येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा व्यवप्सथका कडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शाखा व्यवस्थापक हा तुमच्या केसेस ला मुख्य शाखेतून मंजुरात आली नसल्याचे सांगतो. बँकेने कर्ज न दिल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.
शेतकरी नियमीत कर्जदार – ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र च्या चिंचोली शाखेने थांबवले आहे ते शेतकरी नियमित कर्जदार असून दरवर्षी ते पीक कर्ज फेडतात. अश्या नियमित कर्जदारांना कर्ज देण्यास बँक का टाळाटाळ करत आहे हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे रखडली – ऑगस्ट महिना संपत आला आहे.बँकेने कर्ज न दिल्याने शेतकरऱ्यांच्या शेतातील पिकांना निंदन आणि खत देण्याचे काम रखडले आहे. त्याचा परिणाम पिकावर पडत आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न? -।पिकांचे संगोपन वेळेवर न केल्या गेल्यास त्याचा परिणाम उत्पन्नवर पडतो. मागच्या वर्षी आधीच नापिकी आणि त्यात उत्पन्नाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. आता बँकेने कर्ज न दिल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
+1
+1
+1