आरोग्य व सौंदर्य

शरीराचे दुखणे ह्यावर “विना गोळ्या, विना सर्जरी” 100% उपाय – डॉ. अक्षय कहालकर

Spread the love

 

भंडारा ( प्रतिनिधी) आज आपण सगळीकडे बघतोय की शरीराचे दुखण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. साधारणत: दर दहा व्यक्तींमध्ये आठ व्यक्तींनी आयुष्यात मानदुखी व कंबरदुखी कधी ना कधी अनुभवली असते. दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली व चुकीच्या पध्दतीने हाताळलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने या व्याधींच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहे. दहा, वीस किंवा कितीही वर्षांपासून चे दुखणे असू द्यावेत, ते लवकरच “विना सर्जरी” बरे होणारच. त्यामुळेच मी डॉ. अक्षय कहालकर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उदा. भंडारा जिल्हा, पुणे व मुंबई येथे बऱ्याच रूग्णांना समस्यामुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे.

*मानवी मणक्याची रचना*
मानवी मणका एक कठीण रचना आहे जी दोन्ही गतिशीलता (वाकण्यासाठी आणि फिरण्यासाठी ) आणि स्थिरता (सरळ उभे राहण्यासाठी) प्रदान करते. बाजूने पाहिल्यावर पाठीची सामान्य वक्रता हि “S” सारखी असते. ही वक्रता वजन विभाजीत करण्यास आणि तणाव सहन करण्यास मदत करते. मानवी पाठीचा कणा हा मणके व दोन मणक्यांमधील गादी अशा पध्दतीने ही एक मालिका असते. एकूण ३३ मणक्यांनी ही मालिका बनलेली असते. त्यात ७ मानेचे मणके (सर्व्हायकल), १२ मणके पाठीचे (थोरॅसिक), ५ कंबरेचे (लंबार), ५ जोडलेले सेक्रम आणि ४ जोडलेले मणके (कॉसीक्स) असे असतात. हे मणके एकत्र जोडले जाऊन एक पोकळी निर्माण होते.प्रत्येक हाडांच्या (वर्टेब्रा) दरम्यान एक सपाट, गोलाकार डिस्क (इंटरव्हर्टेब्रल डिस्क) असते. डिस्कचा बाह्य भाग कठोर आणि मजबूत असतो ज्याला एनुलस म्हणतात. अंतर्गत भाग मऊ असतो त्याला न्यूक्लियस पल्पोसस असे म्हणतात जो शॉक शोषून घेतो. पाठीचा कणा आसपासच्या आणि पाठीचा कणा संरक्षित करते (कवटीच्या हाडांमुळे आपल्या मेंदूचे संरक्षण कसे होते यासारखेच). परिघीय मज्जातंतू पाठीच्या कण्यामधून बाहेर पडतात. मानेच्या माणक्यामधून (मानेचा भाग ) बाहेर पडलेल्या मज्जातंतू हाताकडे जातात, पृष्ठीय किंवा वक्षस्थळाच्या मणक्यांमधून मज्जातंतू छाती आणि ओटीपोटात जातात आणि कमरेसंबंधी मज्जातंतू पासून पाय आणि जननेंद्रियाकडे जातात.

दुखणे व सुजणे कसं वाढतयं
दोन मणक्यांच्या मधून असलेल्या पोकळीतून क्रमश: डावी व उजवी नस निघते. या नसा स्नायूंना ताकद व त्वचेला संवेदना देतात. ज्यावेळी या नसांवर ताण येतो त्यावेळी वेदना होतात. ज्या ठिकाणी या नसांवर दबाव येतो जसे मानेतील मणक्यांजवळ अथवा कंबरेच्या मणक्यांजवळ त्याप्रमाणे क्रमश: वेदना होतात. तळ हातात तसंच पायात, पोटरीत व तळ पायापर्यंत वेदना होतात. त्याचप्रमाणे हातापायाला येणाऱ्या मुंग्या यामुळेच जाणवतात. अतीव दाबामुळे क्वचित रुग्णांना स्नायूंची ताकद कमी झाल्याचं जाणवतं. मणक्यांना आधार देण्यासाठी व सुयोग्य हालचालींसाठी ही मणक्यांची रचना लिगामेंटस व स्नायूंनी सक्षम असते. ९०% मानदुखी व कंबरदुखी ही यांत्रिक स्वरुपाची अर्थातच मेकॅनिकल असते. हाताच्या बोटांना जर मागच्या दिशेने वळवलं व त्याच स्थितीतील अधिक काळ दाब दिल्यास वेदना निर्माण होऊन जोपर्यंत दाब कमी होत नाही तोपर्यंत वेदना वाढते व स्नायूंच्या भागात पसरते. ही वेदना एक शारीरिक संकेत असतो. पुढे होणारी इंज्युरी टाळण्यासाठी हाच प्रकार मणक्यांमधील वेदना निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

मानदुखी व कंबरदुखीचे प्रमुख* कारण म्हणजे चुकीच्या उठण्याच्या व बसण्याच्या पध्दती जसे १) खूप वेळ बसणं, २) जास्त वेळ वाकून काम करणं, ३) पुन्हा पुन्हा वाकावं लागणं, ४)जड वस्तू उचलणं, ५) चुकीचा ताण पडेल अशा स्थितीत झोपणं.

*आपल्यामध्ये सर्वसाधारण गैरसमज व चुकीची भावना….*
1) मी दररोज व्यायाम किंवा योगासने करतो/ करते त्यामुळे मला मानदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकत नाही.

2)ग्रामीण भागात 100 रूपयांत इंजेक्शन व पेनकिलरच्या गोळ्या खाऊन एका दिवसांत बरं होतो व कामाला जाणे हे चुकीचे आहे, ह्यामुळे सुरूवातीला काही दिवस बरं वाटतो पण मग मोठ्या ऑपरेशन शिवाय पर्याय नसतोच. त्यामुळे सुरूवातीलाच योग्य ते लक्ष द्या.
3) जर मला तरुणपणी मणक्यांचा त्रास सुरु झाला तर तो जसं वय वाढणार तसा वाढणार.
4) मणक्यांच्या समस्यांचे निदान करण्यासाठी एमआरआय व इतर चाचण्यांची गरज असतेच.
5) मानदुखी व कंबरदुखी घालवण्यासाठी बेडरेस्ट हा एकमेव योग्य उपाय आहे.
6) मानेचा पट्टा व कंबरेचा पट्टा हा वापरलाच पाहिजे.
7) खूप काळांपासून दुखणं असेल तर सर्जरी हाच एकमेव पर्याय आहे.
अशा प्रकारचे समज, गैरसमजामुळे योग्य उपचारपध्दती मिळण्यास विलंब होतो व तेवढाच जास्त काळ रिकव्हरीला लागतो. तसंच यामुळे निष्क्रियता वाढते, दैनंदिन जीवनातील कार्यशील जीवनशैली मंदावते, त्यामुळे नैराश्य, चिडचिड होणं, कुणावर तरी आपण निर्भर असल्याची भावना न्यूनगंड निर्माण करते, सामाजिक कार्यात सहज सहभागी होण्यास स्वारस्य राहत नाही. थोडक्यात काय तर या वेदना या रुग्णाचे दैनंदिन जीवन विस्कळीत करतं.

*उपचार पध्दती सर्वात स्वस्त व 100 % बरी करणारी…..*
सर्टिफाईड कायरोप्रॅक्टरद्वारा अशा प्रकारच्या शरीराच्या सर्व दुखण्यावर सहज मात करता येऊ शकते. तज्ज्ञ कायरोप्रॅक्टरचा मुख्य उद्देश हा केवळ उद्भवणाऱ्या लक्षणांना बरं करणं हा नसून मुळापासून त्याचं कारण शोधून त्यावर योग्य उपचार करण्यावर असतो. तज्ज्ञ कायरोप्रॅक्टरद्वारा एकदा पूर्ण तपासणी झाल्यानंतर रुग्णांना योग्य ती उपचार पध्दती सूचवली जाते. त्याचबरोबर रुग्णांना योग्य पध्दतीने उठणं, बसणं, व्यावसायिक कामाच्या पध्दतीत त्यानुसार करावे लागणारे सुयोग्य बदल सुचविले जातात.
या उपचार पध्दतीत कमीत कमी ट्रिटमेंट मध्ये १०० टक्के रिलीफ दिला जातो. ८०-९० टक्के मणक्यांच्या सर्जरी टाळणं देखील शक्य आहे.
रुग्णांना वेदना मुक्तीसाठी महत्त्वाची टीप म्हणजे होणाऱ्या वेदना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ असतील तर त्वरीत योग्य मार्गदर्शन घेणं. तुमच्या शरीराचे आरोग्य तुमच्या हातात, हे लक्षात ठेवा.

*-डॉ. अक्षय कहालकर*
*एम.डी कायरोप्रॅक्टर थेरपी, निसर्गोपचार तज्ज्ञ*
*संपर्क: 9579211571*
*उपलब्ध ठिकाण : पुणे, ठाणे व भंडारा जिल्हा*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close