शाशकीय

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने जे. सी. बी. लावून पाडली वन विभागाची शासकीय इमारत?

Spread the love

मोहाडी / प्रतिनिधी

– मोहाडी- तालुक्यातील जांभोरा गावातील हा प्रकार असून 20-25 वर्षांपासून जुनी असलेली वन विभाग खाताच्या कर्मचाऱ्याला राहण्यासाठी सोय म्हणून वन विभाग प्रशासनाने ही इमारत बांधली होती. ग्रामपंचायतने सदर इमारत निरलिखित झाल्याच्या ठराव सन 2021-2021 मध्ये घेतला होता. पण इमारत निरलिखित झाली की नाही अशी कोणतीही चाचणी ग्रापंप्रशासन्याने केली नाही. किंवा सदर इमारत निरलिखित झाल्याच्या पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला बांधकाम विभागाकडून प्राप्त झाला नाही. नियमानुसार इमारत पाडण्यापूर्वी वन विभागाशी सल्लामसलत करून त्यानंतरच संबंधित इमारत पडायला हवी होती पण संपूर्ण ग्रामपंचायतने नियमाबाहेर जाऊन सदर इमारत बांधकाम पाडल्याचे समजते. ग्रामसेवक वाढई यांना विचारणी केली असता ग्रामपंचायतने सदर इमारत निरलिखित झाल्याने पाडण्यास काही अडचन नाही असे ठराव घेतले होते असे सांगितले पण बांधकाम विभागाकडून इमारत निरलिखित झाली किवा नाही असा कोणताही पत्र प्राप्त झाला नाही असे सांगितले. तर सरपंच वानिता राऊत यांना विचारला असत्या सदर मासिक मीटिंग मंध्ये ठराव घेतल्यामुळे इमारत पाडण्यात आली असे सांगितले. हीच बाब ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना विचारले असता आम्हाला ठराव केव्हा घेतले ते माहीतच नाही असे सांगितले तर सरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला अलिप्त ठेवून स्वतःच्याच मनमार्जीने सदर ठराव घेतल्याचे सांगितले. सरपंच व ग्रामसेवक वाढई आणी ज्या पदाधिकाऱ्यांनी सदर इमारत जे. सी. बी लावून पाडली त्याच्यावर अपात्रे ची कार्यवाही व्हावी अन्यथा आम्ही आंदोलनाला बसू असे ग्रापं सदस्य मुकेश फुले व विनायक परतेती यांनी सांगितले.सदर इमारत माझ्या मालकीक्काच्या जागेत येत असल्यामुळे संबधित इमारत मी जे. सी. पि लावून पाडली ग्रामपंचायत व वनविभागाची त्या जागेवर कोणताच हक्क नाही असे भूपेंद्र पवनकर यांनी सांगितले.जुनी झालेल्या इमारत पाडण्याच्या अधिकार ग्रामपंच्यातला कोणी दिला? ती इमारत जीर्ण होती किवा नाही यांचा बांधकाम विभागणी चाचणी करून पत्र दिला किवा नाही? वन विभागाची इमारत असल्यामुळे इमारत पडण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने वन विभागाला विश्वासात घेतले किव्हा नाही? आपल्या पदाचा दुरुपयोग करून पदाधिकाऱ्यांनी इमारत पाडली का? असे विवीध प्रश्न गावकर्यांच्या मनात निर्माण होत आहे.ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला चाप बसण्यार का? की अशीच ग्रामपंचायतची मनमर्जी चालू राहिल हा प्रश्न गावाकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे? गावातील कोणतीही जुनी इमारत? आपल्या मनमर्जीने ग्रामपंचायत पाडेल का? जरी ग्रामपंचायत कडे संबंधित इमारतीचे निरलेखित झाल्याची चाचणी पत्र असो किंवा नसो? असा भीतीचा वातावरण जांभोरा गावात निर्माण झाल्य आहे. अस्या मनमानी कारभाराला चाप बसावी म्ह्णून लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जांभोरा गावकरी करीत आहेत
“वन विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याला इमारतीचा पंचनामा करण्याचे सांगितले व पोलीस प्रशासनामंध्ये तक्रार करण्यास आदेश दिले आहे ” *एस. एस.शेंडे सहाय्यक उपवनसंरक्षक विभाग भंडारा*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close