Uncategorized

आपल्या कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर प्राचार्य पदापर्यंत पोहचलेले डॉ.रविंद्र नत्थोपंतजी सोनटक्के

Spread the love

डॉ.रविंद्र नत्थोपंतजी सोनटक्के यांचा जन्म आता सध्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाण्याखाली गेलेल्या मिर्झापूर,नेरी या गावात झाला. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर त्यांनी ,उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मॉडेल हायस्कूल वाठोडा येथे व उच्च शिक्षण आर्वी येथे स्व.दादासाहेब काळे यांनी स्थापन केलेल्या संस्थेत घेतले. त्यांनी पदव्युत्तर पदवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथून प्राप्त केली. त्यानंतर तिथेच त्यांनी प्राध्यापक म्हणून काही काळ आपली सेवा दिली नंतर स्व.दादासाहेब काळे व स्व.भैय्यासाहेब काळे यांच्या सांगण्यावरून त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज, कारंजा (घा) येथे रुजू झाले.
गेल्या ३१ वर्षापासून डॉ.रवींद्र सोनटक्के यांनी कारंजा (घा) येथे विद्यादानाचे काम केले. कारंजा (घा) तालुका तसा ग्रामीण भागाशी निगडित असलेला तालुका, शहरासोबतच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून असंख्य विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी येत त्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील शिक्षण त्यांच्याशीच निगडित होऊन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉ.रविंद्र सोनटक्के यांनी केला. आपल्या ३१ वर्षाच्या सेवे दरम्यान असंख्य विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. सामाजिक कार्याची पहिलीपासूनच ओढ असल्याने त्यांनी तिथे सामाजिक कार्य सुद्धा सुरू केले. त्यांचे गाव पुनर्वासित झाल्यानंतर तेथे पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून पाण्याची चळवळ सुरू असताना त्यांनी जन्मभूमीला पाणीदार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यासोबत दुसऱ्याच वर्षी कारंजा (घा) हा तालुक्याची पाणी फाउंडेशन साठी निवड झाली. त्यांनी पूर्ण तालुक्यात गावागावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून संपूर्ण गाव खेड्यांमध्ये पाणी फाउंडेशन ची ज्योत पेटवली. त्या माध्यमातून असंख्य गावामध्ये पाणी फाउंडेशन चे काम सुरू झाले व त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसू लागला.विद्यार्थ्यांची नाळ जोडलेला एक प्राध्यापक म्हणून सर्वदूर त्यांची ख्याती आहे. आपल्या वक्तशीरपणासाठी त्यांची ओळख आहे. आपल्या कार्यावर होणार असणारे निष्ठा मी जवळून पाहिले आहे. भक्ती योगा पेक्षा कर्म योगाला भगवतगीतेमध्ये महत्त्व दिले आहे तर हाच कर्मयोग त्यांनी पूर्णतः अंगीकारलेला आहे. एखादे कार्य हाती घेतल्यानंतर ते पूर्णतः होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. असा माणूस म्हणजे डॉ.रवींद्र सोनटक्के. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्य करताना आपला अनुभव व ज्ञान पणाला लावून विद्यार्थ्यांच्या हितांचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहे. महाविद्यालयात गेल्यानंतर आपली तासिका घेणे हे काम सर्वात पहिले आणि महत्त्वाचे आहे बाकी इतर कामे नंतर करायचे हा नियमच त्यांनी आपल्या पूर्ण सेवा काळादरम्यान अंगिकारला होता. शिक्षण व सहकार महर्षी स्व.दादासाहेब काळे यांच्याशी त्यांच्या घराण्याची निष्ठा होतीच, ती निष्ठा पुढे स्व.भैय्यासाहेब काळे यांच्याशी देखील ती तेवढीच कायम राहिली. आज संस्थेच्या अध्यक्ष ॲड.शोभाताई काळे, संस्थेचे सचिव श्री.प्रदीपभाऊ काळे, कोषाध्यक्ष तथा कृउबास सभापती श्री.संदीप भाऊ काळे यांच्याशी देखील ती निष्ठा कायम आहे.
एकदा मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही आर्वीत राहून सुद्धा गावा सोबत इतके ऋणानुबंध का बरं ठेवता तेव्हा त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही जुन्या गावात राहत होतो तेव्हा माझ्या घरून कोणीतरी माझा टिफिन आणत होते. आणि तो रस्ता अक्षरक्ष: गोठ्यांचा होता. त्या रस्त्यावरून ती भाजी सांडायला नको म्हणून सायकलला न लटकवता तो टिफिन हातात आणून माझ्यापर्यंत पोहोचवत होते. म्हणून मी आज जे आहोत त्यामध्ये त्या टिफिन आणणाऱ्या किंवा मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या गावातील व्यक्तीचे योगदान असल्याने आता मी माझ्या कडून गावासाठी जे काही करता येईल ते करून ते जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यातच एक भाग म्हणून त्यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरी स्वतःच्या वडिलांच्या नावाने ग्रंथालय देखील सुरू केले व त्याचा कारभार ते स्वतः बघतात. त्यावरून गावासाठी, गावाच्या विकासासाठी आज प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये ते अग्रेसर असतात. जन्मभूमी सोबतच आपली कर्मभूमी म्हणजे कारंजा(घा) तालुक्यातील विद्यार्थ्यांना आणखी आपल्याला काय देता येईल जेणेकरून त्यांची प्रगती होईल या दृष्टीने त्यांनी अविरत प्रयत्न आजपर्यंत केले आहे. आणि त्याचीच फलश्रुती म्हणता येईल की संस्थेने विश्वास ठेवून ज्या महाविद्यालयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, ज्या महाविद्यालयाच्या बाकांवर बसून त्यांनी शिक्षण घेतले. आज त्या महाविद्यालयाच्या सर्वोच्च पदी म्हणजे आर्वी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी त्यांचे नियुक्ती झाली आहे.आज त्यांनी पदभार प्राचार्य पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मा.डॉ.रविंद्र सोनटक्के सरांचे मनपूर्वक अभिनंदन… व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा….

– प्रा.दर्शनकुमार चांभारे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close