सामाजिक

आजोबां कडे पोहण्याचा हट्ट करणाऱ्या दोन नातवांचा तलावात बुडून मृत्यू 

Spread the love

या दोघांना वाचविण्याच्या नादात आणखी तीन तरुणांचा मृत्यू

बोटाद / नवप्रहार न्यूज नेटवर्क

आजोबांसोबत तलावाजवळ गेलेल्या नातवंडांनी आजोबांकडे पोहण्यासाठी तलावात उतरण्याचा हट्ट केला. सुरवातीला आजोबांनी त्यास नकार दिला पण नातवंड पिच्छा सोडायला तयार नसल्याने त्यांनी त्याना काठावर पोहण्याची ताकीद देत रजामंदी दर्शवली. पण मुलं ती मूल ती खोल पाण्यात गेली आणि पोहणे येत नसल्याने बुडू लागली. बुडत असल्याने त्यांनी मदतीची याचना केली त्यावेळी त्याठिकाणी तीन मूल होती. त्यांनी  पोहणे येत नसतांना सुद्धा मागचा पुढचा विचार न करता  बुडत असलेल्या मुलांना वाचविण्यासाठी तलावात उडी मारली त्याना देखील पोहणे येत नसल्याने ते तिन्ही बुडाले.

तलावात अंघोळ करत असताना ही मुलं अचानक खोल पाण्यात गेले. त्यामुळे ही दोन्ही मुलं बुडू लागली. त्यांनी वाचवण्यासाठी धावा केला. हा तीन मुलांना बुडताना पाहून तलावावर असलेल्या तीन मुलांनी कसलाही विचार न करता या खोल पाण्यात उडी घेतली. या मुलांना वाचवण्यासाठी गेलेले ही तीन मुलेही बुडाली. पाचही मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती बोटाचे पोलीस अधिक्षक किशोर बलोलिया यांनी सांगितलं.

या तलावात बुडालेली सर्व मुले ही 16-17 वर्षाचे आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी या मुलांच्या आजोपबांची साक्षही नोंदवली गेली आहे. कृष्णा सागर तलावात ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे मोठ्या प्रमाणावर लोक अंघोळीसाठी जात असतात. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी असा प्रकार झाला नव्हता, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. या परिसराला साखळदंडाचा वेढा घातला पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close