क्राइम

प्रियकराने अखेरच्या भेटी साठी बोलावले अन्…..

Spread the love

उदयपूर /नवप्रहार ब्युरो 

             त्यांच्यात प्रेम होते. दरम्यान या बाबत तरुणीच्या घरच्यांना माहीत झाल्यावर त्यांनी तिला गावाकडे बोलावून घेतले. आई तिचे लग्न ठरवले. तिचा साखरपुडा देखील झाला. मध्यंतरी ती पुन्हा भावाकडे आली. त्याला त्याबद्दल कळल्यावर त्याने तिला शेवटी एकदा भेटायला ये म्हणून बोलावले. आणि जे घडले त्याने सगळेच हादरले. 

 निकिता त्रिवेदी अस त्यात तरुणीचे नाव आहे. तिच्या प्रियकराने तिला अखेरचं भेटायचं म्हणून बोलवलं. पण, ही भेट तिच्या आयुष्यातील अखेरची भेट ठरली. तिच्यावर जीव ओवाळून टाकण्याच्या मोठ मोठ्या गोष्टी करणाऱ्या तिच्या प्रियकरानेच तिचा जीव घेतला.

ही घटना आहे राजस्थानमधील उदयपूरची. तारीख सोमवार 23 जून 2025, वेळ दुपारी 1.30 वाजताची. उदयपूरच्या हिरणमग्री भागातील कांसा गोल्ड हॉटेलमध्ये एक तरुण आणि तरुणी आले. त्यांनी एक खोली घेतली. जवळपास सहा तास हे दोघे त्या खोलीत एकत्र होते. त्यानंतर रात्री 8 वाजताच्या दरम्यान तरुण खोलीतून बाहेर पडला आणि हॉटेलमधून निघून गेला.

रात्रभर कुणालाही इतकी मोठी घडल्याची कुणकुण लागली नाही. मंगळवारी सकाळी जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी या खोलीचं दार उघडलं तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना एक तरुण रात्री 8 वाजताच्या सुमारास या खोलीतून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी तपास करताच त्याची सारी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला हॉटेल जवळच्याच एका रुग्णालयातून ताब्यात घेतलं. त्यानंतर या भयंकर घटनेचा उलगडा झाला.

22 वर्षीय नर्सिंगची विद्यार्थिनी निकिता त्रिवेदी आणि तिचा प्रियकर विजय भोई (27) या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. विजय भोई हा एक कोरिओग्राफर आहे आणि तो इव्हेंटसंबंधी कामंही करत होता. तर, निकिता जी मूळची ऋषभदेव येथील रहिवासी होती आणि उदयपूरमध्ये तिच्या भावासोबत राहत असताना नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या या नात्याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी निकिताला गावी बोलावून घेतलं. तिला समजावलं आणि तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं. तिचा साखरपुडाही झाला. निकीतानेही कुटुंबाच्या इच्छेचा मान राखला आणि विजयसोबतचे सारे संबंध तोडले. ती त्याच्याशी बोलतही नव्हती.

त्यानंतर काही काळाने कुटुंबाने पुन्ह निकिताला तिच्या शिक्षणासाठी उदयपूरला पाठवलं. आता विजयला कळालं होतं की निकिताचं दुसऱ्या कोणाशी लग्न होणार आहे. म्हणून त्याने तिला अखेरचं भेटायला ये, असं सांगत बोलावलं. अखेरची भेट ऐकून निकिताही त्याला भेटायला आली. ते हॉटेलच्या खोलीत गेले. यावेळी त्यांच्यात निकिताच्या साखरपुड्यावरुन वाद झाला. वाद वाढताच विजयने निकिताचे केस धरले आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने निकिता जागीच कोसळली.

त्यानंतर विजयने स्वत: देखील आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या हाताची नस कापली. परंतु, वेदना सहन न झाल्याने तो हॉटेलमधून पळाला आणि स्वतः रुग्णालयात गेला.

मंगळवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोली उघडली तेव्हा त्यांना आत निकिताचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेले डीएसपी छगन पुरोहित आणि ठाणेदार भरत योगी यांनी एफएसएल टीमसोबत पुरावे गोळा केले आणि मृतदेह शवागारात पाठवला. पोलिसांना हॉटेलच्या खोलीत अशा काही गोष्टी सापडल्या आहेत, ज्यावरुन हे लक्षात येतं की विजयने आधीच निकिताच्या हत्येचा कट रचला होता. त्याने त्याच उद्देशाने तिला बोलावलं होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close