सावरी येथील वीजचोरांना दणका; कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई सुरु
प्रकरण :- जल जिवन मिशन अंतर्गत नाली खोदकामात चोरीचे विद्युत पुरवठाचे वापर
भंडारा(जवाहरनगर) :- वीजतारांवर आकडे टाकून विजेचा
वापर करणाऱ्यांना दणका देत आरोपी विरोधी महावितरणने कार्यवाही केली आहे.
सावरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जल जिवन मिशन जिल्हा परिषद भंडारा , हर घर जल अंतर्गत लाखों रूपये खर्च करून पाण्याची टाकी बांधकाम व मुख्या पाईप लाईन चे खोदकाम करण्यासाठी मागील तीन महिन्यापासून गावातील मुख्य पोळवरून आकोडे टाकून वीज चोरी करण्यात आले.या विषयीची बातमी झळकताच महावितरण विभागाचे शहापूर सर्कल शाखा व्यवस्थापक अभियंता महेश कोडवते यांनी
वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरु करून संबंधित कंत्राटदारावर
वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरु
करून तसे अहवाल वरिष्ठांना सादर केले.
यामुळे जवाहरनगर परिसरात शासकीय कामात विज चोरी करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालात काय नमूद आहे याबाबीची माहिती गोपनीय असल्याने ती माहिती देता येत नाही असेही कोडवते यांनी बोलून दाखविले असले तरी, मागील तीन महिन्यापासून दोन डेक्कर मशीन ३२ ते ३४ एम्पियार चे सरळ मुख्य लाईन वर चालविले आहे,जे प्रती तास एक मशीन दोन युनिट विद्युत पुरवठा लागतो अशा दोन मशीन ला प्रती दिवस १६ युनिट विद्युत पुरवठा चा वापर सतत तीन महिने चोरीचे विद्युत वापर करण्यात आला आहे यात कमर्शियल दर प्रमाणे जरी दंड आकारणी केली तरी लाखो चे घशात दंड आकारणी होत असते.परंतु मागील तीन महिन्यापासून चोरी चे विद्युत पुरवठ्याचा वापर सुरू असल्याचे माहिती,गावातील लाईनमन नी घटना स्थळी भेटी देऊन वरिष्ठांना ही माहिती दिले गेले नाही का? या विषयी संबधित अधिकाऱ्यांना प्रत्येक्ष भेट घेऊन नागरिकांनी याविषयीचे माहिती देऊनही या अधिकाऱ्यांकडून कारवाही त्या वेळी न करणे ,यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे , या अधिकाऱ्यांना म्यानेज करण्यासाठी कंत्राटदाराकडून एका सरपंचाला पुढे करून मोठा आर्थिक रसद पुरविले गेली. व ही रसद महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता यांचे पोहचविले गेली असल्याने,या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून कारवाही करण्यात आली असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे त्यामुळे या अधिकाऱ्याकडून संबधित कंत्राटदारावर नाममात्र कारवाही करण्यात आल्याचे दर्शविल्या गेल्याची चर्चा नागरिकात असून यांप्रकरणाचे उच्च स्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई ची मागणी केली जात आहे
……….