कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीत शिरल्याने 4 वारकऱ्यांचा मृत्यू तर 9 जखमी
संगमनेर / नवप्रहार मीडिया
आळंदीकडे निघालेल्या शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीत मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. अपघात झाला आहे. यात 4 वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 9 वारकरी जखमी झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला आहे.
या अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींनवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या 36 वर्षांनापासून आयोजित करतात. यंदाच्या 37 वे वर्ष आहे. या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते.
ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली त्यावेळी अपघात झाला. अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला MH12 VT 1455 नंबरचा कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच तर दोन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय. अपघातात नऊ वारकरी जखमी असून जखमींना संगमनेर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनर चालक नशेत असल्याचे तसेच त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या अपघातातील मृत्यू झालेल्या वारकऱ्यांमध्ये भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता) यांचा समावेश आहे.
कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना मदत केली. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली.