शाशकीय

अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला पाणी पुरवठयाच्या मागणीसाठी करण्यात आले आंदोलन

Spread the love

लोटलोटीत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला पोहचली ईजा

दोन म्हाताऱ्यांना उन्हाचा तडाखा बसल्याने करावे लागले इस्पितळात भरती

मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) / संजय गरपवार

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 26 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलकांनी आज दि.16 जून रोजी आपल्या विविध मागण्यांसह नळ दमयंती जलाशयातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्यासाठी हल्लाबोल आंदोलन केले.
मोर्शी तहसील कार्यालयापासून शेकडो महिला पुरुष आंदोलन करते अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जाऊन त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसले तत्पूर्वी त्या ठिकाणी पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी सुरू केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे,तहसीलदार सागर ढवळे,ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी समाज्यसपनेची भूमिका घेऊन आंदोलनकर्त्यांना आपल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आले आहे असे सांगून तहसीलदार सागर ढवळे यांनी उपमुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव यांना दूरध्वनीवरून सर्व माहिती कथन केली. मात्र त्यांनी प्रधान सचिवाशी बोलण्याचा सल्ला विशद केला. जिल्हाधिकारी यांना सुद्धा घटनेची हकीगत पोहचविण्यात आली. परंतु धरणग्रस्तांच्या मागण्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील नसल्याने ही बाब शासन स्तरावरील असून याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी हातात दगड घेऊन अप्पर वर्धाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले.व 30 ते 40 आंदोलन कर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आंदोलनदरम्यान झालेल्या दगडफेकीत लोटालोटीत व झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याला डोळ्याला मार बसला असून आंदोलनात सहभागी दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. यावेळी मोर्शी,वरुड, शिरखेड पोलीस तसेच दंगा पथक तैनात करण्यात आले होते.या अगोदर धरणग्रस्त बांधवांनी मायवाडी येथे पोहोचून हल्लाबोल आंदोलन सुरू करून मायवाडी येथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)नांदगाव पेठला करणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मोर्शी पोलिसांनी तो हाणून पाडला होता.त्यानंतर मोर्शी अमरावती रोडवर असलेल्या पंचायत समिती समोर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा छेडले होते.या आंदोलनात मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो धरणग्रस्त महिला पुरुष उपस्थित होते. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी कलम 68 69 अंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेऊन सुटका करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close