चाकण येथे लव्हजिहाद ? कुबेर गुप्ता वास्तविक होता सफर आदिल

स्वतःला कथित हिंदू बनवून आणि नाव बदलून तरुणींशी मैत्री करून त्यांना आपल्या प्रेम जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध बनवणे. त्याची चित्रफीत बनवून तिला ब्लॅकमेल करणे त्यानंतर तिच्याशी लग्न करणे आणि त्यानंतर तिला धर्मपरिवर्तनासाठी बाध्य करणे अश्या प्रकरणात भयंकर वाढ झाली आहे,. सफर आदिल असलेल्या तरुणाने आपले नाव कबीर गुप्ता सांगत तरुणींशी मैत्री केली. तो तरुणीला घेऊन चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यात घेऊन गेला. ते बसून गप्पा मारत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव कबीर गुप्ता असे सांगितले. या लोकांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात मस्जिद आणि दर्ग्याचे फोटो आढळून आले. आणि ओळखपत्र तपासताच जी सत्यता बाहेर आली ते पाहून उपस्थित आणि कथित कबीर गुप्ता सोबत आलेल्या मुली हैराण झाल्या. तरुणी इतक्या संतापल्या की त्यांनी सफर आदिल उर्फ कबीर गुप्ता ला चपलेने बदडले . .
याबाबत बजरंज दलाचे चाकण संयोजक मनोज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यामधून जात होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास त्यांना एक जोडपे किल्ल्यात बसलेले दिसले. त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हटकले. विचारणा केल्यावर मुलीने खरे नाव सांगितले. परंतु, त्या मुलाने कबीर असे अर्धवट नाव सांगितले. त्याला आडनाव विचारल्यानंतर त्याने गुप्ता सांगितले. त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी करताच टाळाटाळ सुरु केली. ओळखपत्र खोलीवर विसरल्याची खोटी माहिती त्याने दिली.
कार्यकर्त्यांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये दर्गा आणि मशीदीचे फोटो आढळून आले. त्याचे पाकिट घेऊन त्यातील ओळखपत्र तपासले असता त्यामध्ये आढळून आलेल्या आधार कार्डावर सफर आदील असे नाव असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. सफर आदील हा झारखंडचा रहिवासी असून तो चाकणमधील अॅक्टीव्ह नावाच्या एका कंपनीत काम करतो. या मुली देखील तेथेच काम करतात.
देशमुख आणि कार्यकर्त्यांनी या तरुणींची समजूत काढली. त्यांना विविध उदाहरणे देऊन लव्ह जिहादचे गांभिर्य पटवून दिले. त्यानंतर या मुलींनी आदिलला चपलांनी मारले. त्याची धुलाई करीत पुणे सोडण्याची तंबी दिली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याला तात्काळ झारखंडला बोलावून घ्या अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी तंबी दिली आहे. देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एक तरुणी सावज होता होता वाचली. तिच्या विनंतीवरुन पोलिसात तक्रार करण्यात आली नाही.