Uncategorized

दुकान दाराशी वाद : तलवारीने हल्ला

Spread the love

मुबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

 मुंबईत दिवसाढवळ्या दुकानदारावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. शहरातील पायधुनी परिसरात दुकानदार आणि  दोन तरुणांत वाद झाल्याने त्यांनी दुकानदारावर तलवारीने हल्ला केला.अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल अशी आरोपींची नावे आहेत.

हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि दोन्ही तरुणांमध्ये खरेदीवरून वाद झाला, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले. या दोघांना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हल्ला का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close