आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चाकूने भोसकून हत्या

सांगली / नवप्रहार न्यूज नेटवर्क
आयटीआय मध्ये शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसंतदादा साखर कारखान्याच्या कमानीच्या पाठीमागे ही घटना घडली आहे. घटना उघड होताच शहरात खळबळ माजली आहे. राजवर्धन राम पाटील मूळ गाव मुतकूनकी तालुका तासगाव असे मृत युवकाचे नाव आहे. राजवर्धन याचा पाठलाग करून खून करण्यात आल्याचे समजते.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, राजवर्धन पाटील हा औद्योगिक वसाहत सांगली येथील शासकीय आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे. तो दोन दिवसाच्या सुट्टीसाठी बुधगाव येथील त्याच्या मामाकडे आला होता. तो सायंकाळी सांगली साखर कारखाना परिसरात आला असता. त्याला तिघा संशयतांनी वसंतदादा साखर कारखाना कमानीच्या पाठीमागे घेऊन त्याचा खून करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात हलवला असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहे.