जिल्हा शल्यचिकित्साच्या आदेशाची पायमल्ली, पालकमंत्री संजय राठोड यांनी लक्ष द्यावे, जनतेची मागणी.

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
नेर येथील ग्रामीण रुग्णालयातील काही डॉक्टर शासनाचा पगार व व्यवसायरोधी भत्ता घेऊन देखील स्वतःचे क्लिनिक टाकून खाजगी रुग्ण सेवा करत आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सांनी एक आदेश काढून खाजगी रुग्णसेवा न करणाऱ्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु नेर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्साच्या आदेशाची पायमल्ली करत असतांना दिसुन येते. ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टरांनी नेर येथे क्लिनिक उघडून बसल्याने ग्रामीण रुग्णालयात कमी व किल्निक मधे अधिक वेळ देत असल्याने हे डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या उपचारासाठी उशीरा पोहचत असल्याने अरजूनां कमालीची त्रास सहन करावा लागत आहे.अनेक रुग्ण चिठ्ठी काढूणही डॉक्टरांची वाट पाहत रांगेत तातकळत उभे राहवे लागते. शुगर असलेल्या रुग्णां जवळ शुगरचे र्काडं नसेल तर त्याला औषधी विभागात गोळ्या मिळत नाही. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज शुगरचे रुग्ण गेल्या पंधरा दिवसा पासून गोळ्या पासून वंचित आहे. शुगरचा रुग्ण डॉ.कल्पना सुरजूसे कडे चार वेळा जाउनही त्यांनी र्काडं दिले नाही. बुधवारला या सकाळी या सकाळी आलं तर चार वाजता या असे डॉक्टर कडून ऊडवाऊडविचे उत्तरे दिली जातात.शूगरचे र्काडं वैद्यकीय अधिकारी डॉ संजय जाधव यांच्या आदेशानुसार दिले जातात असेही डॉक्टर कडून सांगण्यात आले. डॉ. जाधव यांना फोन वरुण संपूर्ण केला असता फोन उचलत नाही. रुग्णालयात एखादा व्यक्ती गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आला असता त्या रुग्णांच्या उपचारासाठी तेथील कर्मचाऱी डॉक्टरांना फोन करून रुग्णालयात बोलावतात फोन केल्यानंतरही अनेकदा डॉक्टर उशिरा पोहोचतात. तो पर्यंत कर्मचारी त्या रुग्णाची मलमपट्टी करून ठेवली जाते. क्लिनिक वरून डॉक्टर आल्या नंतर त्या रुग्णाला तपासताच रुग्णांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविल्या जाते. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणा मुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे याकडे अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी लक्ष दयावे अशी नेर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.