Uncategorized

ठाणे जिल्ह्यात ATS ची कारवाई , भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात असलेल्या साकिब ला अटक

Spread the love
पडद्या इथ त्याने केली होती सुरवात 
गजवा ए हिंद चा प्रयोग , अल शाम कायदा करायचा होता लागू 
चला तर जाणून घेऊ या कोण आहे साकिब आणि काय केले होते त्याने 
मुंबई / नवप्रहार ब्युरो
 2 जूनला महाराष्ट्रात ATS ने ठाणे जिल्ह्यातील पडद्या येथे कारवाई करत  22 लोकांना ताब्यात घेतले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 22 लोकांनी काय केले होते. ? तर आम्ही आपणाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही.
                  पडद्या या गावाला इस्लामिक स्टेट म्हणजे राज्य घोषित करण्यात आले होते. आणि हा प्रकार साकिब याने केला होता. साकिब हा भारतात बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा पदाधिकारी होता. आणि तो इसीस या दहशतवादी संघटनेच्या टोळी सोबत जुळला होता.
 देशाची आर्थिक राजधानी मुंबई पासून अगदी जवळ सुरू होता हा प्रकार – देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून फक्त 68 किमी अंतरावर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजपासून फक्त 72 किमी अंतरावर, महाराष्ट्र पोलिस मुख्यालयापासून फक्त 75 किमी अंतरावर आणि मुंबईतील पश्चिम नौदल कमांड कार्यालयापासून ७४ किमी अंतरावर असलेल्या पडद्या जवळील बोरिवली गावाला इस्लामिक स्टेट घोषित करण्यात आले होते.
 ATS ला माहिती मिळताच केली कारवाई – राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा इथं छापा टाकला. 22 जणांच्या पथकानं कारवाई केली. 400 ते 500 पोलिसांच्या पथकाने संपूर्ण गाव ताब्यात घेतले .
 अल शाम करायचे होते – साकिब ला येथे अल शाम करायचे होते. म्हणजे बोरिवली ला इस्लामिक घोषित करून येथे शरिया कायदा लागू करायचा होता. आयसिसचा नेता बगदादी देखील अल शाम निर्माण करू इच्छित होता.
 या कारणाने केली या गावाची निवड – 2011 च्या जनगणनेनुसार, पडघा येथे 83 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणूनच साकिबने येथे गजवा-ए-हिंदचा पहिला प्रयोग केला आणि भारतीय भूमीवरील एक गाव अल शाम म्हणून घोषित केले. हे साकिबचे चाचणी स्थळ होते.
 संपूर्ण भारताला करायचे होते इस्लामिक राष्ट्र – साकिबला संपूर्ण भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करायची होती. यासाठी साकिब एका आंतरराष्ट्रीय कट्टरपंथी. त्याच्या अल शाम येथे तिरंगा नाही तर दहशतवादी संघटना आयसिसचा झेंडा फडकवायचा होता. भारतीय संविधानाचा कायदा नाही तर शरिया कायदा लागू करण्याचा त्याचा कट होता.
साकिब च्या घरात सापडल्या आक्षेपार्ह बाबी – साकिब नाचन जिथे लपला होता तिथे महाराष्ट्र एटीएसने छापा टाकला. शोध मोहिमेत एटीएसने मोबाईल हँडसेट, तलवारी, चाकू आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारे आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त सापडली आहेत. साकिबच्या तपासात झालेले खुलासे गजवा-ए-हिंदच्या आंतरराष्ट्रीय कटाकडे निर्देश करतात.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close