‘घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना अभियान’
वर्ध्यात बेरोजगरीवर सत्ताधाऱ्यांकडे उत्तर नाही
शुवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यातील सूर
वर्धा /प्रतिनिधि
आशिष इझनकर
वर्ध्यात संपूर्ण कार्यक्षमतेने वाढणारा शिवसेना ठाकरे गट हा पक्ष वर्ध्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रामुख्याने कार्य करणार आहे. दहा वर्षात येथील सत्तेतील नेते मोठा उद्योग वर्ध्यात आणू शकले नाही. ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्याची ही परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे. त्यामुळे रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम करून लोकांना आधार देण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने करणार असा सूर वर्ध्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या झालेल्या सम्पर्क मेळाव्यात उमटला आहे. ‘घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना’ हे अभियान राबविण्यात येत आहे, यासाठी सम्पर्क प्रमुख निलेश धुमाळ, नेहल पांडे आणि निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांना पक्ष वाढीसाठी आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने जुने शिवसैनिक आता एकत्र व्हायला लागले आहे. हा मेळावा आर्वी नाका चौक येथे घेण्यात आला.
अभियानाच्या उदघाटनाला उपजिल्हाप्रमुख सुनील पारिसे, महिला आघाडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारती कोटमकर, युती सेना जिल्हाध्यक्ष अवंतिका शेंडे, ज्येष्ठ शिवसैनिक गायकवाड ज्येष्ठ शिवसैनिक किशोर धोंगडे उपस्थित होते.
यावेळी आलोडी गाव चे राजीव मोगरे, व पिपरी मेघे ची क्षमाताई उडान यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पश्चिम विदर्भ लोकसभा संपर्क नेते खासदार अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या मार्गदर्शनात ‘घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना’ या अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम व पक्षप्रवेश कार्यक्रम आर्वी नाका चौक येथे पार पडला.
यावेळी निलेश धुमाळ म्हणाले की, वर्धा विधानसभा क्षेत्रात पक्ष ताकतीने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य वर्ग हा शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला कुटुंब प्रमुख म्हणून प्रवेश करत आहे. विविध समाज कामाच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचून जी बांधणी वर्धा विधानसभा क्षेत्रात सुरू आहे ते अप्रतिम आहे. सोबतच शिवसेना घराघरात नेऊन लोकांचे काम करून लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. घराघरात आणि मनामनात शिवसेना स्थापन करण्याचा निर्धार यावेळी वर्धा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी केला. त्यासाठी शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. युवा सेनेचे विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी वेळोवेळी वर्धेत येऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमध्ये दौरा करीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी बोलून दाखविला.
महिला आघाडी संघटिका कांचनताई ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार वाढत चालला आहे खोटे बोलून खोके कमवणारा या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ या वर्धा विधानसभा क्षेत्रात आता आली आहे, असे प्रतिपादन केले. विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांनी एक लाख लोकांपर्यंत वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना हे अभियान घेऊन जाण्याचा संकल्प केला. दोन महिन्यात दहा हजार शिवसैनिक वर्धा विधानसभा क्षेत्रात उभे करू असा ठाम विश्वास त्यांनी केला.
ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. मागील दहा वर्षात एकही उद्योग इथले स्थानिक आमदार वर्धा विधानसभा क्षेत्रात आणू शकले नाही. आरोग्याची ही परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे. त्यामुळे रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम करून लोकांना आधार देण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने करणार आहे असे पांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आर्वी नका चौक येथे गर्दी जमली होती.
शिवसैनिक मिलन भाई गांधी, शेखर भाऊ इंगोले अमित भाऊ भोसले अक्षय भाऊ भारस्कर चिरंजीवी भाऊ मकेश्वर , संजय भाऊ पांडे , अक्षय भाऊ बाळासाहेब, शुभमभाऊ निमजे शिवसैनिक , सैनिक नरेंद्र भाऊ खंडागळे, कुमार भाऊ हातागळे इत्यादी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .