शैक्षणिक

मराठी शाळा टिकल्या पाहिजे, यासाठी समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी

Spread the love

आँनलाईन कामाच्या ससेमिऱ्यामुळे शिक्षकवर्ग हवालदिल
मराठी शाळासाठी चळवळीचे गरज
प्रतिनिधी / आर्वी
साप्रंत स्थितीत मराठी शाळा या शब्दाची लवकरच दुर्मिळ गोष्टीमध्ये नोंद करावी लागेल की, अशीच विदारक स्थिती सध्या निर्माण झाली आहेत. आपल्या मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांची स्थिती शैक्षणिक क्षेत्रात कमकुवत होतांना दिसत आहेत.
.याला कारणीभूत कोण, असा प्रश्न विचारला जाईल, तेव्हा याला जबाबदार आपण स्वतःच आहोत, हे प्रत्येक पालकांना मान्य करावे लागेल. वस्तुतः मराठी भाषिकामध्ये विविध कारणांनी मुलांना काही अपरिहार्य कारणामुळे इंग्रजी भाषेत शिकविण्याची प्रथा रुढ झाली,आहेत. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मराठी शाळेत शिकुन पुढे काही भविष्य नाही, इंग्रजी शिवाय पुढे भविष्यात जाता येत नाही. इंग्रजी शिवाय जीवनात तरणोपाय नाहीत, अशीच वेगवेगळी कारणे सांगुन, आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतो. याचा परिणाम म्हणून मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याला जबाबदार कोण आहेत, यावर सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे.
यावर कडी म्हणून आता बरेच जण असाही प्रश्न विचारु लागले आहेत की,मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे, मुलांना तिथे चांगली संगत मिळत नाही, शिक्षक चांगले नसतात. वगैरे -वगैरे आरोप केल्या जाते, परंतु हे आरोप निराधार आहेत. कारण जिल्हा परिषदेचे शिक्षक हे निवड मंडळ, टिएटी,सिऐटी या स्पर्धात्मक परिक्षा देवुन शिक्षक बनले असतात. कुणाच्या वशिला व ओळखीच्या साहाय्याने शिक्षक बनले आहेत,.
.काही जण शिक्षकांना जबाबदार धरतात, तर काही जण
सरकार व.राजकारण्यांवर याची सर्वस्वी बेमालूमपणे जबाबदारी टाकून मोकळे होतात. परंतु यासाठी समाजातील सर्वच घटकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहेत..
विशेषतः मराठी भाषेला, म्हणजे पर्यायाने मराठी भाषिक जनतेला चांगले दिवस यायचे असतील. मराठी शाळा टिकल्या पाहिजे. त्यात वाढ झाली पाहिजेत, त्यात वाढ झाली पाहिजे, विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक, बोधात्मक, क्रियात्मक, असा सर्वागीण विकास झाला पाहिजे, आणि या ध्येयाने संपूर्ण मराठी जनता-जनार्दनांनी एकत्र व संघटितपणे येवून काम केलं पाहिजे.
तसेच मराठी शाळा टिकवण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरातून व्यापक चळवळ उभी करणे, ही काळाची गरज आहे. सयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५हुतात्म्यांना शांती मिळण्यासाठी महाराष्ट्राने मराठी शाळा टिकवण्यासाठी सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा मोठी चळवळ उभी करण्याची आज नितांत आवश्यकता आहेत.
…. प्रत्येक मुलाला आपल्या मार्तूभाषेत शिक्षण मिळणे किंवा शिक्षण देणे गरजेचे आहेत. कारण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी मार्तूभाषेतुन शिक्षण हीच. शास्त्रशुद्ध शैक्षणिक पद्धती आहेत. केवळ मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा व.गुणवत्ता खालावला आहेत, अशी नुसती ओरड करून चालणार नाहीत तर त्या मागील विविध कारणांचा व पैलूंचा मागोवा, आपल्याला घ्यावा. लागेल. किबहुना मराठी शाळा चालवणं हेच मोठे आता. आव्हान निर्माण झाले आहे.
या सगळ्या मध्ये मराठी शाळांचा आर्थिक डोलारा सांभाळणे ही सहजसाध्य गोष्ट नाहीत. अर्थातच
मराठी शाळा टिकल्या पाहिजे, यासाठी स्वतापासुन प्रयत्न करायला सुरुवात केली. तर कदाचित. भविष्यात हेच चित्र नक्की बदलेल, हे मान्य करावे लागेल.

भाषा हि विकासाची जननी असुन, मार्तूभाषेतुन मिळणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणारे, असते. आजही अनेक पाश्चात्य व.युरोपियन राष्ट्रात त्यांच्या स्वतःच्या मूळ भाषेतून शिक्षण. दिल्या जाते. विकसनशील देश जपान, फ्रान्स, जर्मनी,चीन, स्पेन, इत्यादी राष्ट्रामध्ये स्वतः च्या मार्तूभाषेतुनच प्राथमिक व माध्यमिक. शिक्षण. दिल्या जाते, त्यामुळे मराठी भाषेतून महाराष्ट्रात शिक्षण देणे, आवश्यक आहेत. प्रथमतः आपली मार्तूभाषा मराठी नंतर राष्ट्र भाषा हिंदी नंतर आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी अशा क्रमानुसार. शिक्षण. मिळणे, गरजेचे आहेत. त्यामुळे. मराठी भाषेच्या. शाळा टिकणे,आवश्यक आहेत. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध तंज्ञानी एकत्रित येवून मराठी शाळा टिकल्या पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. पाहिजे, असे माझे प्रांजळ मत आहेत.

डॉक्टर श्याम भुतडा
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक
आर्वी. जिल्हा वर्धा.

 

मार्तूभाषेत मिळालेले शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला परस्परपूरक असते, असा शिक्षण तंज्ञानी व विविध,सामाजिक शास्त्रज्ञांनी दावा केला आहेत, आणि त्याचा अभ्यास केला असता व त्याचे,सुक्ष्म निरीक्षण व.विश्लेषण केला, असता,तो बरोबर आहेत, असे माझे प्राजंळ मत आहेत. म्हणून आपल्या मराठी भाषेतील,शाळा टिकल्या पाहिजे, तेथे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळाले हे मान्य आहेत. परंतु विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकाबरोबरच इतरही समाजातील घटकांचे सहकार्य,मिळणे आवश्यक आहेत. आंतरराष्ट्रीय भाषा आवश्यक असली तरीही आपल्या मार्तूभाषेला विसरता कामा नयेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय. भाषेचा अट्टहास करणे हे पुर्णतः चुकीचे आहे.

श्री अरुण म.कहारे
शैक्षणिक तंज्ञ आर्वी जिल्हा वर्धा
…………………………..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close