संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंचे मोठे योगदान:-प्रकाश मारोटकर
नांदगांव खंडेश्वर येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
नांदगांव खंडेश्वर/ संदीप अंबोरे
भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र वेगळा करण्याचा प्रयत्न असताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी झाली तेव्हा चळवळी मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे मत शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व्यक्त केले
पुढे बोलताना मारोटकर म्हणाले अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम केले अण्णाभाऊ हे एक थोर समाज सुधारक प्रतिभाशाली कवी साहित्यिक होते असेही प्रकाश मारोटकर म्हणाले नांदगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मारोटकर यांच्या हस्ते फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अक्षय हिवराळे गजानन तायडे महेश वानखडे प्रेम हिवराळे सूरज गडलिंग आकाश मंगळे मयूर वानखडे सुधीर हिवराळे भुमेश्वर गोरे मनीष चौधरी श्रीकृष्ण कांबळे जय मोकळेकर किशोर मारोटकर दशरथजी हिवराळे विलास तायडे गजानन लोखंडे आदित्य अवचारे प्रथमेश गडलिंग सौ कल्पना हिवराळे वंदना हिवराळे जोती कांबळे वनिता तायडे सीताबाई लोखंडे पावनी तायडे प्रिया हिवराळे इत्यादी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते