हवामान खात्याने या तीन जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा दिला ईशारा

पुण्यात पावसाचा कहर
रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढलंय. गेल्या 32 वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय तर अनेक सोसायट्या पाण्यात गेल्यात. तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आली आहेत. रस्त्यावरील पूर्णच्या पूर्ण कार पाण्यात गेल्यात. सकाळपासून नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय. बोट, लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आहे. जवळपास 5 फुटांपर्यंत साचलेलं पाणी आता पावसाचा जोर कमी झाल्याने ओसरतंय. पुण्यातील एकतानगर, निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचलंय. आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे.
पिंपरी चिंचवडच्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय. पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली गेली आहेत. मुळशी तालुक्यात अतिमूसळधार पावसाने लवासा येथे डोंगर सदृश्य दरड तीन बंगल्यावर पडल्याने दोन इसम या ढिगाऱ्या खाली गाडले गेले, मात्र जोरदार पाउस सध्या मुळशीत सुरू असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर असून गेल्या दोन तासापासून ती स्थिर आहे. तर तिकडे धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाची चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे पाणी शहरात यायला सात ते आठ तास लागतात त्यामुळे त्यानंतर पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वरती जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात