ब्रेकिंग न्यूज

हवामान खात्याने या तीन जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा दिला ईशारा 

Spread the love
पुणे  / नवप्रहार डेस्क 

             राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने अगदी धुमाकूळ घातला आहे.  मागच्या 48 तासांमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रात पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरू असतानाच हवामान खात्याने पुढच्या 3 तासांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन तास पाऊस जोरदार बरसेल, तसंच वारा 40-50 किमी प्रती तासाच्या वेगाने वाहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे मुंबई-ठाण्यामध्येही पुढच्या 24 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, तसंच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाने केलं आहे.

 

पुण्यात पावसाचा कहर

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढलंय. गेल्या 32 वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय तर अनेक सोसायट्या पाण्यात गेल्यात. तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आली आहेत. रस्त्यावरील पूर्णच्या पूर्ण कार पाण्यात गेल्यात. सकाळपासून नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय. बोट, लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आहे. जवळपास 5 फुटांपर्यंत साचलेलं पाणी आता पावसाचा जोर कमी झाल्याने ओसरतंय. पुण्यातील एकतानगर, निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचलंय. आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे.

पिंपरी चिंचवडच्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय. पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली गेली आहेत. मुळशी तालुक्यात अतिमूसळधार पावसाने लवासा येथे डोंगर सदृश्य दरड तीन बंगल्यावर पडल्याने दोन इसम या ढिगाऱ्या खाली गाडले गेले, मात्र जोरदार पाउस सध्या मुळशीत सुरू असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर असून गेल्या दोन तासापासून ती स्थिर आहे. तर तिकडे धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाची चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे पाणी शहरात यायला सात ते आठ तास लागतात त्यामुळे त्यानंतर पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वरती जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close