कन्नमवार विद्यालयात महावाचनाच्या उत्सव उपक्रम
आर्वी / प्रकाश निखारे
मुलांमध्ये वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासन, ‘युनिसेफ’ व ‘रीड इंडिया’ तर्फे वाचन चळवळ उपक्रम राज्यभरात राबवण्यात सुरुवात झाली आहे हा उपक्रम छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आला हा उपक्रम राबवण्यासाठी मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचे सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी भाषा नैसर्गिक रित्या शिकतात मात्र विद्यार्थ्यांनी वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. दुसरीमध्ये मुलांना वाचन येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून वाचन होत नसल्याने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातून सर्वेक्षणातून समोर आले आहे, त्यामुळे २०२६ पर्यंत राज्यातील तिसरी पर्यंतचे प्रत्येक मूल ओघवते वाचन करू शकेल, आठवीपर्यंतचे प्रत्येक मूल शिकवण्यासाठी वाचू शकेल हे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची चळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने आता राज्यात वाचन चळवळ राबवली येत आहे.या चळवळीत शालेय शिक्षण विभाग राज्य सरकार ‘रीड इंडिया ‘आणि प्रथम बुक्स या संस्थांच्या सहभाग आहे, मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी शाळा ऑनलाईन झाल्या होत्या, विद्यार्थी जास्त प्रमाणात मोबाईल वापरू लागले त्यांच्या स्क्रीनिंग टाईम वाढला बऱ्याचदा मोबाईल हातात आला की मुलं अभ्यासाऐवजी सोशल मीडियाच्या आहारी जातात त्यांचे पुस्तक वाचन फार कमी होतं मुलांना वाचण्याची गोडी लागावे म्हणून कन्नमवार विद्यालयातील कला शिक्षक प्रकाश निखारे यांनी अनोखा उपक्रम शाळेत राबवित आहे. विशेष म्हणजे या उपक्रमातून मुलं केवळ पुस्तकच वाचत नाही तर ते साहित्य समीक्षा करीत आहात शाळेत विविध उपक्रम राबवले जातात येत्या तिसरी ते आठवी शिकणाऱ्या मुला मुलींना वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी अनोखा उपक्रम राबवला जातात विद्यार्थ्यांनी कथा व कादंबरीचे वाचन केले. त्यानंतर त्यांची समीक्षा लिहिली. शाळेने या समीक्षाच्या हस्तलिखित तयार केले आहेत . कन्नमवार विद्यालयात केलेला हा तसा पहिला प्रयोग असून मुलांचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
* *चळवळीचे उद्दिष्टे*:
• मुलांना वाचनाचे महत्त्व सांगणे तिसरी पर्यंतच्या प्रत्येक मुलांमध्ये वाचन कौशल निर्माण करणे.
• मुलांना वाचण्याची संधी उपलब्ध करून देणे
• लोकसहभागातून उपक्रमाला प्रसिद्धी देणे.
• वयोगटांनुसार मुलांना मराठी भाषेतील साहित्य उपलब्ध करून देणे वाचक वर्ग तयार करणे
• वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे
• कथा, कविता, कादंबरी, नाटकाद्वारे मुलांमध्ये रसस्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे
• मुलांमध्ये नैतिक मूल्य रुजवणे.
• उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी
• डिजिटल संसाधनाच्या वापरास प्रोत्साहन देणे
• रीड इंडिया सेलिब्रेशन उपक्रम • ग्रंथोत्सव पुस्तकाचे प्रदर्शन पुस्तकांची उपलब्ध आहे.
*अनेक इलेक्ट्रॉनिक्स मॉडेल पुस्तकापासून विद्यार्थी दूर चाललेले आहेत ही भाव ओळखून पुन्हा घडवणे कारण लेखकाचे प्रदीर्घ काळाची अनुभव काही क्षणात आपल्यापर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून पोहोचतात आणि आपल्या जीवनाच्या भाग होतात. त्यामुळे हा वाचनसंस्कार शाळेपासून सुरू झाला तर जीवनातील आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे पेलण्याची शक्ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होईल.*
–