कारंजा (लाड) तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी-डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळाकडून तहसीलदारांना निवेदन सादर
कारंजा (लाड): दिनांक २६/०२/२०२४ रोजी मध्यरात्री कारंजा (लाड) तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे तालुक्यातील अनेक गावांमधील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात मोठी हताश निर्माण झाली आहे. पीडित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ कारंजा मानोरा यांच्या वतीने तहसीलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले.
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे शेतक-याच्या रब्बी पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताशी असलेले पीक संत्रा, हरभरा, गहू, तीळ, टरबूज, यांसारख्या रब्बी पीकचे अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमध्ये हातातून निसटून जाताना दिसून येत आहे. तात्काळ पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच, तालुक्यातील सर्व पंचायत समिती आणि कृषी कार्यालयामार्फत तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी डॉ. महेश चव्हाण यांच्यासह मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.