हटके

अरे बाबो ! वरात एक दोन नव्हे तर अख्खे 13 दिवस थांबली हे आहे कारण 

Spread the love

पाली ( राजस्थान )/ नवप्रहार मीडिया 

          जगात अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. त्यामुळे असे ही होऊ शकते का ? असा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. पण अश्या घटनांमुळे लोकांची मानसिकता अशी ही असू शकते का असा ही प्रश्न पडतो.राजस्थान च्या पाली जिल्ह्यात जी घटना घडली आहे त्यामुळे अश्या घटनांवर हसावे की रडावे हा विचार देखील येतो.

सेणागाव येथील एका तरुणीचे 3 मे रोजी लग्न होते. सगळ्या विंधींची तयारी सुरु होती. मात्र सप्तपदीच्या वेळी वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. नववधू पळून गेल्याचे कळल्यावर लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी नववधुच्या कुटुंबियांनी तिला परत आणण्याची मागणी केली, नववधूच्या घराबाहेर वरात ठाण मांडून बसले होते. वरात तब्बल 13 दिवस तशीच थांबली होती. मात्र नववधू परत घरी आली आणि पुन्हा रितीरिवाजानुसार तिने लग्न केले आणि त्यानंतर पुन्हा प्रियकरासोबत पळून गेली.

विवाहीतेच्या पित्याने पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी 4 ऑक्टोबरला माहेरी आली होती. 6 ऑक्टोबरला घरी जाण्यासाठी सासु-सासऱ्यांना बोलावले होते. मात्र रात्री सर्व झोपल्यानंतर ती प्रियकरासोबत पळाली. आम्ही चार दिवस तिचा शोध घेत आहोत. याआधीही ती पोटदुखीचे कारण सांगून 3 मे ला पळून गेली होती. त्यावेळी 13 दिवस घरात वरात थांबली होती. 16 मे रोजी तिला घरी परत आणून लग्न केले होते. मुलीचा नवरा हा सिरोही जिल्ह्यातील कैलाश नगर येथील रहिवासी आहे. तो आंध्र प्रदेशातील एका मिठाई दुकानात कामाला आहे. नववधूच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close