विशेष

शेतीच्या कुंपणात वाहत असलेल्या अवैध वीज प्रवाह चा धक्का लागून इसमाचा मृत्यू  ?

Spread the love
सोनोरा शिवारातील घटना 
शवविच्छेदन अहवाल आल्यावर कारवाईची दिशा ठरणार – ठाणेदार 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                        जंगली जनावरांपासून पिकाचे नुकसान करन्यायाठी कुंपणाच्या तारात सोडलेल्या अवैध विद्युत प्रवाहामुळे एका इसमाचा जीव गेल्याची घटना सोनोरा (काकडे) शेत शिवारात घडली आहे. या बद्दल मृतकाच्या नातेवाईकाने मंगरूळ दस्तागिर पोलिसात तक्रार नोंदवली असून मंगरूळ पोलीस शवविच्छेदन अहवाल आल्यावरच कारवाई करणार असे ठाणेदार दाभाडे यांनी सांगितले.
                 उपलब्ध माहिती नुसार सोनोरा काकडे शेत शिवारात सोनोरा येथील पोलीस पाटील असलेले अनुप देविदास मानकर यांच्या शेतातील कुंपणात सुरू असलेल्या अवैध विद्युत प्रवहामुळे एका इसमाचा मृत्यू झाला असून तो अध्यापही कुंपणाच्या शेजारी पडला असुन तो तारेला चिकटलेला असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी जमा झाली. उपस्थितांपैकी अनेक लोक मृतकाला ओळखत असल्याने त्यांच्या नातेवाईकांना याबदसल कल्पना देण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झला  असण्याची शक्यता –   या अवैध करंट प्रकरणात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव गोपाल मधुकर राऊत असून तो सोनोरा काकडे च्या बाजूला असलेल्या आष्टा येथील रहिवासी आहे. मृतदेहाला दुर्गंधी सुटली असल्याने आणि किडे लागले असल्याने गोपाल यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असल्याची  शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेत मालकाने याबद्दल पोलिसांना का कळविले नाही – पिकाचे जंगली जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी काही लोक शेताच्या कुंपणात अवैध वीज प्रवाह सोडतात. पण उशिरा रात्री सोडलेला वीज प्रवाह सकळी लवकर उठून बंद देखील करतात.अश्या वेळी ते शेताचा फेरफटका देखील मारतात. मग शेत मालक अनुप मानकर यांच्या लक्षात हा प्रकार आला कसा नाही हा यक्ष प्रश्न ठरत आहे.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह तेथेच राहू दिला नसावा ?- गावकऱ्यात सुरू असलेल्या चर्चेनुसार दररोज शेतात फेरफटका मारणाऱ्या शेत मालकाच्या लक्षात हा प्रकार आला असा नाही ? कदाचित हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते याची कल्पना आल्याने  आणि सगळे काही शांत झाल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावता येईल म्हणून तर त्यांनी  मृतदेह तसाच पडला राहू देऊन ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत तर नसावे असा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बद्दल कळविले आहे- ए . ए. खान
नागरिकांत गोपाल यांच्या मृत्यू नंतर विविध चर्चेला उधाण  फुटले आहे. शेतमालकाने कुंपणात अवैध वीज प्रवाह सोडला होता.असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यक्बाद्दल मंगरूळ विद्युत विभाग अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सगळे काही पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करता येईल. तसे  अमरावती येथील विद्युत निरीक्षकांना कळविले आहे.आणि मंगरूळ पोलिसांना पंचनाम्याची कॉफी मागितली आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य ती कारवाई – ठाणेदार मंगरूळ (द)
                        या घटनेबद्दल ठाणेदार यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरवता येईल. कुठलाही भेदभाव न ठेवता योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close