विशेष

अजबच हं …. येथील महिला पाच दिवस राहतात निर्वस्त्र 

Spread the love

               भारत देश विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखल्या जातो. भारतीय सर्वच धर्माचा आदर करत असल्याने जगात भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून ख्याती आहे. देशात काही समाजाच्या प्राचीन परंपरा आहेत ज्या आजही जोपासल्या जातात. याच परंपरेत एक परंपरा आहे ज्यात श्रावण महिन्यात महिलांना पाच दिवस निर्वस्त्र राहावे लागते. हिमाचल प्रदेश मधील मणिकर्म खोऱ्यातील पिनी गावात या प्रथेचे पालन केल्या जाते.

या  गावात महिला श्रावण महिन्यातील तब्बल 5 दिवस कपडे घालत नाहीत. या महिला असे का करतात? यामागे देखील काही कारणे आहेत .झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, या गावातील महिला श्रावण महिन्यातील पाच दिवस निर्वस्त्र राहतात. जर एखाद्या महिलेने ही प्रथा पाळली नाही तर काही दिवसातच वाईट बातमी ऐकायला मिळते, असं मानलं जातं. तसेच या परंपरेचा भाग म्हणून या काळात संपूर्ण गावातील विवाहित जोडपी म्हणजे पती पत्नी एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत.याशिवाय पती पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहतात.

झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, या गावातील महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील पूर्वजांनी ठरवून दिलेल्या प्रथांचं पालन करणं बंधनकारक आहे. या काळात पुरुष दारू व मांसाहाराचं सेवन करू शकत नाही. जर या रुढी- परंपरांच पालन केल नाही तर देवता क्रोधित होते आणि तुमचं मोठं नुकसान होतं असं मानल जातं.

पाच दिवस निर्वस्त्र राहण्याच्या या प्रथेमागे एक इतिहास दडला आहे. ‘लहुआ घोंड’ नावाच्या एका देवतेने या गावात राक्षसाचा वध करुन गावाचं रक्षण केलं होतं. हे सर्व राक्षस सुंदर कपडे घातलेल्या विवाहित स्त्रियांना गावातून उचलून घेऊन जातं होते. या राक्षसांपासून ‘लहुआ घोंड’ नावाच्या देवतेने महिलांचे रक्षण केले. त्या दिवसापासून पिनी गावात या विचित्र परंपरेला सुरुवात झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close