राजकिय

बहुजन आघाडी ला घेऊन काँग्रेस नरमली  

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मिडिया 

                      राज्यात आणि देश पातळीवर भाजपा आणि मित्रपक्षा विरोधात अन3क पक्ष लांमबंद होत आहेत. राज्यात सुद्धा महाविकास आघाडी आणि महाआघाडी असे राजकारण सुरू आहे. एकीकडे शिंदेगट ,फडणवीस आणि अजितदादा असे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट , काँग्रेस आणि इतर पक्ष अशी व्युहरचना सुरू आहे. वंचित आघाडी  आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून मतभेद होते.पण आता काँग्रेस ने नरमाईची भूमिका घेत त्यांच्या सोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी समझोता करण्यात काहीही अडचण नाही, अशी पक्षातील चर्चा आता पुढे आली आहे; परंतु जेव्हा जागावाटपावर चर्चा होईल, तेव्हा ते विचारतील की, आपल्याला किती जागा पाहिजेत? विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे, असे असले तरी हे घडू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा म्हटलेले आहे की, माझ्यात व राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे? राहुल गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नातू आहेत आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आहे. तथापि, काँग्रेसला वाटते की, आंबेडकर यांनी आपल्या अटींमध्ये थोडासा लवचिकपणा आणला तर चर्चा होऊ शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close