चार वर्षापासून आर्थिक दुर्बल विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

. जिल्ह्याचे खासदार आमदार विद्यार्थ्यांन प्रति उदासीन
माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
विद्यार्थ्यांचे कोट्यावधी रुपये अडकले अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे
अंजनगावसुर्जी (मनोहर मुरकुटे
शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्य वाढावे व त्यातून त्यांचा विकास साधल्या जावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने वर्ग ९ ते १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती दिल्या जाते परंतु अमरावती जिल्यातील २०१७-१८ या आर्थिक वर्षात सदर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या २८८ विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून ही शिष्यवृत्ती मिळाली नसून वंचित विद्यार्थी प्रथम शाळेमध्ये व नंतर शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत असून त्यांच्या या प्रश्नाकडे शालेय व्यवस्थापन समिती किंवा शिक्षण विभाग यांचे कडून लक्ष दिले जात नसल्याने त्यांची फरफट होत असल्याचे दिसत आहे, विद्यार्थ्यांचे अडकलेले कोट्यवधी रुपये कोण मिळवून देणार असा टाहो त्यांच्याकडून फोडल्या जात आहे
******** २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अभ्यासाची मेहनत घेऊन गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्ती साठी निवड झाली प्रत्येक शाळांकडून त्या बाबत प्रस्ताव सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले परंतु जिल्हा कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे या वर्षातील जिल्ह्यातील पात्र तब्बल २८८ विद्यार्थ्यांना वर्षाकाठी मिळणारे बारा हजार रुपये गेल्या चार वर्षापासून मिळालेच नसल्याने विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या दृष्टीने आर्थिक अडचणीत सापडले आहेत गेल्या चार वर्षांचे एका विद्यार्थ्यांचे ४८ हजार रुपये या प्रमाणे जिल्ह्यातील तब्बल २८८ विद्यार्थी असे १कोटी ३८लाख २४००० इतका निधी अडकला असून यासाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थी शाळांमध्ये चकरा मारत असून काही विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयातही वारंवार जावून विचारणा केली असता त्यांना कधी उडवा उडविची उत्तरे तर कधी आम्ही केंद्रीय कार्यालयात माहिती दिली आहे त्यांच्याकडून आल्यानंतर मिळेल असे टोलवाटोलवीचे उत्तरे सांगितल्या जात आहे परंतु या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीव पूर्वक कोणीही लक्ष देत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असून पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत आलेल्या या विद्यार्थ्यांकडे आता कोण लक्ष देईल हा प्रश्न निर्माण झाला आहे
खासदारांनी लक्ष द्यावे –
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र शासनाच्या अक्त्यारीत येत असून जिल्ह्यातील वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडकलेल्या शिष्यवृत्ती साठी कोणाकडून दिरंगाई झाली याचा शिक्षणाधिकारी कार्यालयाला जाब विचारून जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी या विद्यार्थ्यांच्या अडकलेल्या शिष्यवृत्ती निधी मिळण्यासाठी प्रयत्न करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहे
वारंवार स्मरण पत्र दिले-
२०१७-१८ मधील विद्यार्थ्यांच्या अडकलेल्या शिष्यवृत्ती साठी जिल्हा कार्यालयाला वारंवार स्मरण पत्र दिल्या जात आहे विद्यार्थी सुद्धा वारंवार याबाबत विचारणा करण्यासाठी येतात परंतु या वर्षीचे शिष्यवृत्ती प्रकरणे का पेंडींग राहिली याचे कारण समजू शकले नाही असे सीताबाई संगई विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास घोगरे यांनी सांगितले
भोंगळ कारभाराने शिष्यवृत्ती अडकली –
गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली आहे शेक्षणीक विकासासाठी केंद्र शासनाची चांगली योजना असताना कार्यालयीन कामकाजातील दुर्लक्षित पणा याला जबाबदार असल्याचे दिसत आहे कारण शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक वेळा याबाबत विचारणा केली काही लेखी पत्र सुद्धा दिले परंतु गेल्या चार वर्षात काहीही उपयोग झाला नाही उलट त्यांच्याकडून उडवा उडविची उत्तरे दिली जातात विद्यार्थी पालक
मुकुंद बुरांडे यांनी सांगितले