घाटंजीत डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला
न.प.प्रशासनाचे अधिकारी मात्र थातूरमातूर धूराळणी करत असल्याची मुख्याधिकारी यांचेकडे यूवक कॉग्रेसची तक्रार.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी नगर परिषद हद्दीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मात्र प्रशासना कडून जनतेच्या हितासाठी कुठलीच उपाययोजना केल्या गेली नाही. डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी न.प.प्रशासनाच्या वतीने काही दिवस आधी मच्छर पळविण्याच्या उद्देशाने धूराळणी काही विशिष्ट भागात करण्यात करण्यात आली पण तीही केवळ दिखाऊ धूराळणी ठरली त्या धूराळणीत सातत्य नाही.त्यामूळे डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी न.प.प्रशासन विभाग ठोस पावले उचलतील काॽ.असा प्रश्न उपस्थित करत घाटंजी यूवक कॉग्रेस अध्यक्ष सुनिल हूड व घाटंजीतील रहिवासी यांनी मुख्याधिकारी अमोल माळकर यांना लेखी स्वरूपात निवेदन वजा आरोग्य विभाग कामात सातत्य नसल्या बाबतची तक्रार लेखी स्वरुपात दिली आहे. घाटंजी शहरातील जनतेच्या आरोग्याचे दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात व त्यात सातत्य असावे दिखावा नसावा तसेच लवकर उपाययोजना न केल्यास तीव्र पवित्रा घेण्यात येईल हेही पष्ट निवेदनातून केले.सदर निवेदनावर सुनिल हूड,नवनीत नागरिकर,विक्की ढवळे, प्रदीप पिन्नमवार,राजु राऊत,संतोष पांढरमीसे,ईंदूबाई पाटणकर, नितीन शेंडे यांचे सह इतरही नागरिकाचे साक्षरी आहे.सदर निवेदन प्रतिलिपीत मुख्यमंत्री,व विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्याचे ही कळते.