क्राइम

परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर गोळीबार करुन हत्या

Spread the love
जालौन / नवप्रहार न्यूज नेटवर्क
 
                देशात सध्या गोळीबारीच्या घटनेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल दिल्लीत न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर एका निलंबित वकिलाने गोळीबार करीत चार गोळ्या झाडल्या. तर आज परीक्षा देऊन परतणाऱ्या तरुणीवर गोळीबार करून हत्या केली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे उत्तरप्रदेश मध्ये  पोलिसांच्या सुरक्षेत तारखेवर येत असलेल्या अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. 
उत्तर प्रदेशातील जालौनमधील केईटी तालुक्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. यात बीएचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा जीवच गेला. परीक्षा देऊन घरी जात असलेल्या तरुणीची मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी भर बाजारात गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पिस्तुल घटनास्थळी टाकून फरार झाले
मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी तरुणीची गोळ्या घालून हत्या केली, ते ठिकाण पोलीस ठाण्यापासून जवळच होतं. ही तरुणी इट ठाणे हद्दीत येणाऱ्या अंधागावची होती. 22 वर्षीय रोशन अहिरवार सोमवारी (17 एप्रिल) ईटीच्या राम लखन पटेल कॉलेजमध्ये बीएची परीक्षा देण्यासाठी आली होती
परीक्षा देऊन झाल्यानंतर रोशनी घरी निघाली होती. त्याचवेळी बाईकवरून दोन तरुण आले. त्यांच्याकडे पिस्तुल होते. त्यातील एका तरुणाने पिस्तुलातून रोशनीवर डोक्यात गोळी झाडली. ज्यामुळे रोशनी जागेवरच गतप्राण झाली.
भरदिवसा झालेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली. त्याचवेळी काही लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुल जागेवर टाकून फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहे.

गोळी लागल्यानंतर तरुणी जागेवरच ठार झाली. काहींनी हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर विरोधकांनीही यावरून योगी आदित्यानाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close