अंजनगाव तालुक्यात वादळी पावसाने गहू, पिकाचे नुकसान
हजारो एककर गहू पिकांचे नुकसान शासनाकडून शेतकरयांना मदतीची अपेक्षा

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी / मनोहर मुरकुटे
आधीच दरवर्षी सततच्या निसर्गाचे अवकृपेने शेतकरी हवालदिल झाला असतांना दरवर्षी काहींना काही संकट ह्या शेतकऱयांवर कोसळत आहे , त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही डबघाईस येत असताना आपली उपजीविका कशी पूर्ण करता येईल ही विवंचना शेतकऱयांची कायम असतांना ह्यावर्षी रब्बी पिकामधील गहू , ह्या पिकाचे नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने खोडगाव, देवगाव, शेलगाव, वडाली, धाडी ह्या भागातील गहू, केळी हे पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी हा पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे, ,शेतकऱ्याने गहू, ह्या पिकावर मेहनत करून कर्जबाजारी होऊन पीक उभे केले ,पिक आता थोड्याच दिवसात काढणीला येनार आणि आपला उदरनिर्वाह चांगला चालेल अश्या आशा पल्लवित होण्याचे मार्गावर असतांना अचानक झालेल्या वादळी पावसाने शेतकऱयांचे नुकसान केले ,अश्या परिस्थितीत शासनाने ह्या भागातील गहू , पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
****†*********************
माझी आधीच परिस्थिती नाजूक असतांना कपाशी ह्या पिकावर रोगराई आली त्यामुळे मी कपाशी चे पीक काढून देवगाव शेतशीवारात दीड एककर गहू पेरला गहू चांगल्या स्थितीत असतांना अचानक रात्री झालेल्या वादळी पावसाने माझ्या दीड एककर गव्हाचे पूर्णपणे नुकसान झाले असे शेतकरी श्याम नाठे ह्यांनी सांगितले