क्राइम

प्रेम विवाहाचा भयानक अंत

Spread the love

मुजफ्फरनगर / नवप्रहार डेस्क 

              प्रेमात पडलेला मनुष्य जो पर्यंत त्याच्या डोक्यावर प्रेमाचे भूत सवार असते तोंपर्यंत तो कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. मग ती स्त्री असो वा पुरुष. प्रेमात मुलबाळ सोडून पती आणि पत्नी प्रियकरा सोबत पळून गेल्याच्या अनेक घटना घडतात. प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तीने प्रेयसी सोबत लग्न तर केले. पण तो तिच्या एका सवयीने ईतका वैतागला होता. की त्याने लग्नाच्या सहा महिन्या नंतरच तिची हत्या केली.

जून 2024 मध्ये समोर आलेली उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील ही धक्कादायक घटना. अरबाज नावाचा तरुण. सहा महिन्यांपूर्वीच उत्तराखंडमधील 21 वर्षीय चाहत नावाच्या तरुणीसोबत त्याने प्रेमविवाह केला होता. घरच्यांना काहीही न सांगता तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. या काळात त्याने अनेक वेळा खोल्या बदलल्या. पण त्यानंतर अरबाजने चाहतची धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा निर्घृणपणे शिरच्छेद केल्यानंतर आरोपीने तिचे हातही कापले होते. मृतदेहाचे अनेक तुकडे केले.

असा झाला हत्येचा उलगडा

पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापती यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, अरबाजने त्याचा मित्र शाहरुखच्या मदतीने बाईकवरून काली नदीत मृतदेह फेकून दिला होता. मात्र नदीत मोठ्या प्रमाणात जलकुंभ वाढला होता.

अनेक दिवस मृतदेह नदीतील जलकुंभात अडकून राहिला आणि पुढे सरकत नव्हता. आठवडाभरानंतर आरोपी पती त्याच्या मित्रासोबत हा मृतदेह तिथून काढण्यासाठी पोहोचला. तेव्हाच पोलीसही तिथे पोहोचले आणि त्याला जागीच पकडलं. मात्र, त्याचा मित्र शाहरुख तिथून पळून गेला. चौकशीत आरोपी पतीने पोलिसांसमोर खुनाची कबुलीही दिली. तरुणाच्या माहितीवरून पोलिसांनी हत्या ज्या शस्त्राने केली होती, ते जप्त केलं.

पत्नीच्या दैनंदिन खर्चाला वैतागला

हत्येमागचे कारण समजू शकलं नाही, मात्र चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, चाहत अतिशय उद्धट होती. तिच्या दैनंदिन खर्चावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. यानंतर अरबाजने मित्राच्या मदतीने तिची हत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close