तलावात बोट उलटून 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना जलसमाधी

10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश ; 7 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
अनेक विद्यार्थी बेपत्ता
बडोदरा / विशेष प्रतिनीधी
गुजरातच्या वडोदरा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बोट तलावात उलटल्याने 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 जखमी विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या 7 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.न्यू सनराइज शाळेचे हे विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थी बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 शिक्षकांसह 23 विद्यार्थी बोटीवर होते. अजूनही अनेक विद्यार्थी बेपत्ता आहे. हरणी तलावावर एका शाळेतील विद्यार्थी हे सहलीसाठी आले होते. बोटीने प्रवास करत असताना अचानक ही घटना घडली. बोट बुडाल्यामुळे 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
वडोदराच्या महापौर पिंकी सोनी यांनी सांगितलं की, शाळेच्या सहलीसाठी हे विद्यार्थी आले होते.न्यू सनराइज शाळेचे हे विद्यार्थी होते. या ठिकाणी एक खाजगी बोट 27 विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जात होती. पण अचानक बोटचं संतुलन बिघडलं आणि बोट बुडाली. या बोटीवर असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. या बोटीवर 23 विद्यार्थी आणि 4 शिक्षक होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पोहोचले. वडोदरा शहरच्या हरणी तलावाचे व्यवस्थापक (VMC)चे अधिकारी घटनास्थळी हजर आहे. रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे.
10 ते 11 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
अग्निशमन दलाच्या 6 टीम घटनास्थळी कार्यरत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 10 ते 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अधिकारी हजर असून बचावकार्य सुरू आहे.
विरोधकांचा प्रशासनावर आरोप
वाचलेल्या 7 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी विरोधकांनी प्रशासनवर आरोप केला आहे की, जेव्हा लहान मुलं बोटीवर चढले होते. त्यावेळी त्यांनी लाईफ जॅकेट घातले नाही हीच मोठी चूक झाली आहे. या बोटीची क्षमता फक्त 15 जणांची होती. पण या बोटीवर 27 जण हजर होते. मृतक शिक्षकांची ओळख छाया पटेल आणि फाल्गुनी सुरती अशी झाली आहे. एनडीआरएफचे जवान सुद्धा घटनास्थळी मदतकार्यात सामील झाले आहे.
गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाला. त्याबद्दल प्रशासनाने सहवेदना व्यक्त केली आहे. या घटनेत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन ऋषिकेश पटेल यांनी दिलं.