विशेष

समृद्धी महामार्गावर पडला खड्डा ,  बांधकामावर प्रश्नचिन्ह ? 

Spread the love

नांदगाव खंडे / प्रतिनिधी 

                          उद्योजक आणि शेतकरी यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून नागपूर- मुंबई समृद्धी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. 800 किमी अंतर अवध्या 10 तासात पूर्ण होणाऱ्या या महामार्गावर मागील काळात झालेल्या अपघाताचे प्रमाण बघता या मार्गाला आता  ‘ मृत्यूचा मार्ग ‘ असे  म्हटल्या जाते.  आता या महार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथे भलामोठा खड्डा पडला आहे.

                        या खड्ड्यामुळे फक्त अपघाताची शक्यता बळावली नाही तर महामार्गाच्या बांधकामाच्या दर्ज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  महामार्गाजवळून शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याची तक्रार करण्यात येत होती. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग  55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

महामार्गावरील प्रवासी सुविधांचा अभाव हे देखील समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांचे कारण मानले जात आहे. सुविधांअभावी वाहन चालकांना सतत लांब पल्ल्याच्या गाड्या चालवाव्या लागत आहेत.

सतत वाहन चालवल्यामुळे वाहनचालकांना हायवेच्या संमोहनाचा त्रास होत असून, लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंगसारख्या चुका होत आहेत. त्यामुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close